मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या वैधानिक समित्या असलेल्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी ०४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज संबंधित प्रभागातील सचिवांना सादर केले. या १७ प्रभाग समित्यांपैंकी ११ प्रभाग समित्यांमध्ये बिनविरोध निवडणूक होणार आहे. तर जी उत्तर प्रभाग समितीमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि उबाठाचे जोसेफ कोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पंधरा मिनिटे यातील एक उमेदवार अर्ज मागे घेणार असल्यामुळे याठिकाणीही बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण १२ प्रभाग समित्यांमध्ये बिनविरोध निवडणूक होणार आहे.



मुंबई महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांच्या निवडणूका तीन टप्प्यात म्हणजे गुरुवारी ५ मार्च, शुक्रवारी ६ मार्च आणि येत्या सोमवारी ९ मार्च रोजी होणार आहेत. या तिन्ही टप्प्यातील निवडणुकांमध्ये महापौर आणि उपमहापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहे.



मुंबई महापालिकेच्या पाच समित्यांमध्ये म्हणजे ए,बी अँड ई , एफ दक्षिण व एफ उत्तर , पी पूर्व व पी पश्चिम, एस अँड टी , एम पूर्व या प्रभाग समित्यांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज भरल्याने याठिकाणी निवडणूक होणार आहे. तर यातील एस अँड टी या प्रभाग समितीमध्ये महायुती आणि विरोधक यांची सदस्य संख्या समसमान असल्यामुळे याठिकाणी ईश्वर चिठ्ठीवर अध्यक्षांची निवड होणार आहे.



येत्या गुरुवारी ०५ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती :


सी अँड डी : भाजप- अकाश पुरोहित,


ए,बी अँड ई : काँग्रेस -ज्ञानराज निकम, भाजप- रोहिदास लोखंडे


एफ दक्षिण व एफ उत्तर : उबाठा- श्रध्दा जाधव, शिवसेना -मानसी सातमकर


आर उत्तर व आर मध्य : भाजप- प्रकाश दरेकर


आर दक्षिण विभाग : भाजप-लिना देहेरकर


पी पूर्व व पी पश्चिम : राष्ट्रवादी काँग्रेस- अजित रावराणे, काँग्रेस- हैदर अली


येत्या शुक्रवारी ०६ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती


एच पूर्व व एच पश्चिम : उबाठा- रोहिणी कांबळे,


जी उत्तर : मनसे :यशवंत किल्लेदार, उबाठा- जोसेफ कोळी


जी दक्षिण : उबाठा : पद्मजा चेंबूरकर,


पी दक्षिण : भाजप- श्रीकला पिल्ले


के पश्चिम : भाजप – रोहन राठोड


के -उत्तर व के- दक्षिण : भाजप- प्रकाश मुसळे

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित

'ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करा'

मुंबई : राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत