महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा

मुंबई : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमित आहे. नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे; असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.


राज्यात काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवा पसरल्या. यानंतर पेट्रोल, डिझेल भरून घेण्यासाठी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक पेट्रोल पंपांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्‍यांनी एक्स पोस्ट अर्थात ट्वीट करून जनतेला विश्वासात घेतले आहे.


पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. युद्धाने २६ व्या दिवसांत प्रवेश केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी शत्रू देशांसाठी बंद ठेवणार, असा इशारा इराणने दिला आहे. जे युद्धात शत्रू अथवा शत्रूचे सहकारी म्हणून सहभागी झालेले नाहीत त्यांच्या जहाजांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली आहे. फक्त इराण सरकारशी समन्वय साधून आणि नियमांचे पालन करत संबंधित देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करता येईल असेही इराणने जाहीर केले. आहे. भौगोलिक स्थितीचा फायदा घेत इराणने युद्ध होर्मुझ सामुद्रधुनी परिसरावर नियंत्रण ठेवले आहे. जगाच्या एकूण तेल व्यापारापैकी २० टक्के व्यापार होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गाने जाते. यामुळे होर्मुझद्वारे केलेल्या कोंडीचा परिणाम हळू हळू जगावर दिसू लागला आहे. या परिणामांच्या बातम्या येत असतानाच राज्यात पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमित आहे. नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे; असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.



Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील