दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडीचा चेहरामोहरा बदलणार; गृहनिर्माण प्रकल्पांना मिळणार वेग

मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसनाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या भागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज विधानसभेत दिली. आमदार अमीन पटेल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते.


८ हजार कुटुंबांना मिळणार हक्काची घरे


कामाठीपुरा परिसरातील सुमारे ८ हजार कुटुंबांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्यासाठी १२ जानेवारी २०२३ रोजी समूह पुनर्विकासाचा (Cluster Development) निर्णय घेण्यात आला होता. यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्त करण्यात आले असून पात्र विकासकांची निवडही पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन याला ‘व्हायटल प्रोजेक्ट’ (अति-महत्त्वाचा प्रकल्प) म्हणून घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले.


उमरखाडी येथील एकूण ८१ इमारतींच्या पुनर्विकासासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाईल. पहिल्या टप्प्यात ३६ इमारतींचे काम हाती घेतले जाणार असून, १२ इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. गरज भासल्यास अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Zero SPAD : EMU Local च्या सिग्नल प्रणालीत सुधारणा, मध्य रेल्वेचा सुरक्षिततेवर भर

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवासी आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी

Supriya Sule : पुणे-मुंबई प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात; सीट बेल्टमुळे मोठा अनर्थ टळला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या गाडीचा पुणे-मुंबई महामार्गावर

BMC News : नगरसेवकांना गृहीत धरून काम करू नका; महापौरांनी अधिकाऱ्यांचे टोचले कान

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मागील पावणे चार वर्षे नगरसेवक नव्हते म्हणून महापालिका प्रशासनातील अधिकारी जर आता

BMC News : महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर, आता नगरसेवकांना विकास निधी वापरण्याचे खाते झाले खुले !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मांडलेले सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज

BMC News : मुंबईतील घटनांवर पाहण्याची महापालिकेची दृष्टी झाली अंधूक

- आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉलची गुणवत्ता खालावली मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील सर्व ठिकाणांवर

Megablock : ठाणे ते वाशी पाच तास रेल्वे सेवा बंद राहणार, तर मध्य रेल्वेवरही रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : 'नीट' परीक्षेमुळे गेल्या रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला होता. मात्र, या रविवारी (१० मे) रेल्वेच्या