Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, टाळावे? जाणून घ्या

मुंबई: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आली आहे. २ मार्च रोजी होलिका दहन असून ३ मार्चला पौर्णिमेसोबतच ग्रस्तोदित चंद्रग्रहण लागणार आहे. ज्योतिषाचार्य श्रीकेतन कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दाते पंचांगानुसार या दिवशी वेधकाळ असूनही धूलिवंदन आणि होळीचा उत्साह साजरा करता येणार आहे. पण ग्रहणाचे शास्त्र पाळताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. विशेषतः गर्भवती, वृद्ध आणि मुलांसाठी वेधकाळाचे नियम वेगळे आहेत. आपण होळीच्या पूजेवेळी, चंद्रग्रहणाचा काळ, वेधकाळात काय करावे आणि काय टाळावे जाणून घेऊया...


यंदा २०२६ मध्ये होळी आणि चंद्रग्रहण एकत्र येत असल्याने अनेकांना शंका आहेत. २ मार्च होलिका दहन तर ३ मार्च चंद्रग्रहण आणि धूलिवंदन आहे.



२ मार्च २०२६ – होलिका दहन



वार: सोमवार
भद्रा असली तरी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिका दहन करावे.
होलिका पूजन करून कुटुंबासह प्रदक्षिणा करावी.
नकारात्मकता, रोग, दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.



३ मार्च २०२६ – पौर्णिमा आणि ग्रस्तोदित चंद्रग्रहण



ग्रहण सुरू: दुपारी ३:२० वाजता
भारतामध्ये ग्रहणाचा आरंभ.
चंद्र उदयाला येताना ग्रहण लागलेलेच दिसेल.
ग्रहण मोक्ष (समाप्ती): संध्याकाळी ६:४८ वाजता



वेधकाळ कधी?



मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरू.
आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांनी सकाळी ११ वाजेपासून वेध पाळावे.



वेधकाळात काय करता येईल?



- पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल.
- देवाला नैवेद्य दाखवू शकता (अतिशय थोडा).
- अभिषेकाचे तीर्थ प्रसाद म्हणून घेऊ शकता.
- एक घास अन्नाचा फक्त वास घेऊ शकता.
- गुरुजी / सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल.
- श्राद्ध करता येईल – स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर गाईला द्यावा.
- वेधामध्ये पूजन निषिद्ध नाही, पण भोजन निषिद्ध आहे.



धूलिवंदन (धुळवड) खेळता येईल का?



होय, वेधकाळात धूलिवंदन आणि रंग खेळणे करता येईल.आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ६:४८ वाजेपर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे.काही ठिकाणी पर्वकाल कमी असेल तर ६:४८ वाजेनंतर मोक्षस्नान करावे.१५–२० मिनिटांपेक्षा जास्त पर्वकाल असल्यास सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा जप करावा आणि ६:४८ वाजेनंतर मोक्षस्नान करावे. त्यानंतर भोजन करावे.



पूजनावेळी (उदा. सत्यनारायण पूजन)



श्री सत्यनारायण भगवानांच्या चरणी एक किंवा पाच तुळशीपत्र अर्पण करावी. प्रसाद (शिरा/पंचामृत) मध्ये एक तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवावा.



काय करू नये?



तुळशीपत्र तुटलेले, सुकलेले वापरू नये. नखे लावून तोडू नये. सकाळी स्नानानंतरच तोडावे.रविवार, एकादशीनंतर द्वादशीच्या दिवशी तुळस तोडणे टाळावे (परंपरेनुसार). योग्य पद्धतीने ठेवलेले तुळशीपत्र घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणते असे मानले जाते.

Comments
Add Comment

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये खळबळजनक घटना, ८ लाखांचे अमली पदार्थ जप्त

अंबरनाथ : भगतसिंग नगर परिसरात अंबरनाथ पोलिसांनी तब्बल ८ लाखांचे हेरॉईन (अमली पदार्थ) जप्त केल्याची घटना समोर आली

Maharashtra CM : स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव!

 मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे 'स्फोटके नियम 2008'

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

SMARTPHONE PHOTOGHRAPHY : स्मार्टफोन फोटोग्राफीची नवी क्रांती; लेन्स आणि सेन्सरपेक्षा 'AI' का ठरतेय भारी?

PHOTOGHRAPHY AND AI : गेल्या अनेक वर्षांपासून आपण स्मार्टफोन खरेदी करताना एकच प्रश्न विचारत आलो आहोत – "कॅमेरा किती

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MUMBAI WEATHER : मुंबई हवामान अपडेट: मान्सूनची चाहूल, शहरात पावसाची शक्यता

MUMBAI : मान्सूनच्या आगमनासोबतच मुंबई आणि परिसरात हवामानात बदल जाणवू लागला आहे. आज, ७ जून रोजी शहरात आकाश अंशतः ढगाळ