वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त


विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती तसेच विषय समित्यांचे सभापती निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत स्वीकृत सदस्यांची निवडसुद्धा झाली असून, अर्थसंकल्पही सादर झालेला आहे. वसई-विरारमध्ये मात्र ही सर्व प्रक्रिया संथगतीने सुरू असून, स्थायी समिती सभापती नसल्याने यावर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मार्च महिन्याचा मुहूर्त निघणार आहे.


वसई-विरार महापालिकेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड २० फेब्रुवारी रोजी महासभेत करण्यात आली आहे. आता याच सदस्यांमधून स्थायी समिती सभापती निवडले जाणार आहेत. यासाठी ५ मार्च रोजी सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लावण्यात आला आहे. पालिकेत बहुजन विकास आघाडीकडे स्थायी समितीत १० सदस्य असून, भाजपकडे ६ सदस्य आहेत. त्यामुळे सभापती पदावर बहुजन विकास आघाडीच्याच सदस्यांची वर्णी लागणार आहे. दरम्यान, महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्तांकडून स्थायी समिती सभापती यांना सादर केला जातो. मात्र वसई-विरार महापालिकेत स्थायी समितीचे सभापती अद्याप निवडले गेले नाहीत.त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला नाही. ५ मार्च रोजी नवे सभापती निवडले जाणार असल्याने ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत ७००/८०० कोटी रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रशासकीय काळात सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प ३ हजार ९२६ कोटी रुपयांचा होता. मालमत्ता कर, पाणीपट्टी यामध्ये वाढ करण्यासह पाणीपुरवठा लाभ कर आणि मल सुविधा लाभ कर तसेच सिसी प्रमाणपत्र घेतलेल्या आणि ओसी प्रमाणपत्र न घेतलेल्या विकासकांकडून दंड म्हणून वसूल करणे अशा प्रकारे पालिकेचे उत्पन्न वाढविण्याची योजना प्रशासनाने आखली होती. मात्र उपरोक्त बाबींपैकी एकही निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकले नाही. त्यामुळे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच सर्व विभागाचा खर्च ३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने परिस्थिती "जैसे थे" अशीच असल्याने यावर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत ७००/८०० कोटी रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापती निवडीनंतर म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.



स्वीकृत सदस्य पदासाठी प्रतीक्षा :


महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता या सर्वांच्या निवडीनंतर सर्वच महापालिकेत स्वीकृत सदस्य पदाची उत्सुकता असते. मुंबईसह काही महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्य निवडल्या गेले आहेत. वसई-विरारमध्ये मात्र याबाबत सुद्धा प्रशासकीय स्तरावरून काहीही हालचाल झालेली नाही. सदस्य संख्याबळानुसार बहुजन विकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी दोन्ही राजकीय पक्षांमध्ये चांगलीच स्पर्धा आहे. दरम्यान, परिवहन समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, वैद्यकीय आरोग्य सहाय्य समिती या समित्यांचे गठन सुद्धा अद्याप झालेले नसून त्यांचे सभापती देखील निवडले गेलेले नाहीत. त्याचप्रमाणे नऊ झोन सभापतीची निवडदेखील करावी लागणार आहे. या प्रक्रियेकडे सुद्धा दोन्ही राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचे लक्ष लागलेले आहे आणि प्रशासकीय स्तरावर मात्र याबाबत काहीही हालचाली नाहीत.

Comments
Add Comment

Ek Din : मोठ्या पडद्यावर ५० वर्षांनंतर पुन्हा खुलणार जपानी रोमांस, 'एक दिन' सिनेमातील 'कोनिचिवा' गाणं रिलीज

मुंबई : अभिनेता आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म ‘एक दिन’, ज्यामध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत

Gayatri Datar : 'त्या' प्रकरणाबाबत गायत्री दातारची आणखी एक पोस्ट, म्हणाली...

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिच्यासोबत एक धक्कादायक

Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या 'या' प्रसिद्ध गाण्यावर थिरकला

मुंबई : भारतीय सिनेसृष्टी जगभरात प्रसिद्ध असून बॉलिवूडच्या सिनेमांसोबतच गाण्यांनाही जगभरात पंसती मिळते.

Tighi Movie : ‘तिघी’ सिनेमाची आंतरराष्ट्रीय झेप; न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये निवड

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या

Sara Arjun : धुरंधर गाजवल्यानंतर आता सारा अर्जून साकारणार 'ही' जबरदस्त भूमिका

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली. या सिनेमात तिनं

Nanded Railway : महाराष्ट्रातून उत्तर भारतीयांसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध, पण नांदेड एक्स्प्रेसचा मुहूर्त कधी लागणार ?

मुंबई : मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. मात्र,