ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. "माणगाव-इंदापूर बायपासचा काही भाग वगळता, येत्या मे महिन्यापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम पूर्णत्वास गेलेले असेल," अशी महत्त्वाची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज विधानपरिषदेत दिली. भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले.



सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभाग घेताना आमदार प्रवीण दरेकर आक्रमक पाहायला मिळाले. "हा महामार्ग रेकॉर्डब्रेक उशिरा होणारा मार्ग ठरला आहे. कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे चाकरमान्यांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत आहे. आता होळीचा सण जवळ आला आहे, अशा वेळी प्रवाशांना हा विहित वेळेत पूर्ण होऊन दिलासा मिळणार का?" असा थेट सवाल दरेकरांनी विचारला. तसेच, महाड येथील गांधारपाले लेणी परिसरात पर्यटन विकासासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.


यावर सकारात्मक उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कामाचे वेळापत्रक स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, "चिपळूणचा महत्त्वाचा पूल मे २०२६ पर्यंत खुला होईल, तर हातखंबा उड्डाणपुलाचे काम याचवर्षी एप्रिलपर्यंत पूर्ण होत आहे. माणगाव-इंदापूर मार्गाची मुदत २०२७ असली तरी, उर्वरित महामार्ग मे २०२६ पर्यंत प्रवासासाठी सज्ज असेल." तसेच, गांधारपाले लेणी येथे पर्यटन विभागाच्या माध्यमातून आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. सरकारच्या या भूमिमेमुळे कोकणच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग