जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, चौधरी नगर भागातील एका पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळल्याने तेथे पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेलचे वितरण सुरू करण्यात आले आहे.


जालना जिल्हा पुरवठा विभागाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. दुचाकी वाहनांसाठी दोनशे रुपयांपर्यंत तर तीन आणि चारचाकी वाहनांसाठी सातशे रुपयांपर्यंत पेट्रोल-डिझेल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कॅन आणि बाटल्यांमध्ये इंधन देण्यासही बंदी घालण्यात आली आहे.


सध्याच्या परिस्थितीवर बोलताना पंप व्यवस्थापकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्येकाला पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. मात्र अनावश्यक गर्दीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळेच पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच इंधन वाटप केले जाईल, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे.


दरम्यान, शेतकऱ्यांनीही प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेलची मोठी गरज आहे. मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे अडचणीत आली आहेत. जिल्हा पुरवठा विभागाच्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. “ट्रॅक्टर थेट शेतातून पेट्रोल पंपावर आणायचा का आणि केवळ दोनशे रुपयांचे डिझेल भरून परत न्यायचा का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.


रामेश्वर सोळुंके, पंप व्यवस्थापक म्हणाले की, "शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसारच आम्ही पेट्रोल आणि डिझेल देत आहोत. प्रत्येकाला इंधन मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून गर्दी करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे."


शेतकरी म्हणाले की, "सध्या शेतीच्या कामासाठी डिझेलची खूप गरज आहे. मात्र निर्बंधांमुळे आम्हाला पुरेसे डिझेल मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी."

Comments
Add Comment

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा

Devendra Fadnavis : जातपडताळणी समितीच्या कामकाजात राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही!

मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; कोणत्याही मंत्र्याने जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे रद्द