जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, चौधरी नगर भागातील एका पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळल्याने तेथे पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेलचे वितरण सुरू करण्यात आले आहे.


जालना जिल्हा पुरवठा विभागाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. दुचाकी वाहनांसाठी दोनशे रुपयांपर्यंत तर तीन आणि चारचाकी वाहनांसाठी सातशे रुपयांपर्यंत पेट्रोल-डिझेल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कॅन आणि बाटल्यांमध्ये इंधन देण्यासही बंदी घालण्यात आली आहे.


सध्याच्या परिस्थितीवर बोलताना पंप व्यवस्थापकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्येकाला पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. मात्र अनावश्यक गर्दीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळेच पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच इंधन वाटप केले जाईल, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे.


दरम्यान, शेतकऱ्यांनीही प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेलची मोठी गरज आहे. मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे अडचणीत आली आहेत. जिल्हा पुरवठा विभागाच्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. “ट्रॅक्टर थेट शेतातून पेट्रोल पंपावर आणायचा का आणि केवळ दोनशे रुपयांचे डिझेल भरून परत न्यायचा का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.


रामेश्वर सोळुंके, पंप व्यवस्थापक म्हणाले की, "शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसारच आम्ही पेट्रोल आणि डिझेल देत आहोत. प्रत्येकाला इंधन मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून गर्दी करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे."


शेतकरी म्हणाले की, "सध्या शेतीच्या कामासाठी डिझेलची खूप गरज आहे. मात्र निर्बंधांमुळे आम्हाला पुरेसे डिझेल मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी."

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य