रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवानिमित्त मंदिरे गर्दीने फुलून गेली असून शहरांमध्ये मिरवणुका, मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातही विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.


प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवानिमित्त पुणे शहरात विविध धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांमुळे शहराच्या मध्यभागासह लष्कर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल करण्यात आले आहेत. उद्या दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत बाजीराव रस्ता आणि लष्कर परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद किंवा वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.



बाजीराव रस्ता बंद



शहरातील मुख्य मानला जाणारा बाजीराव रस्ता मिरवणुकीच्या काळात वाहतुकीसाठी बंद असेल. पुरम चौकातून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. ही वाहतूक टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक आणि खंडोजी बाबा चौक मार्गे वळवण्यात येईल.



​लष्कर आणि छावणी परिसर



लष्कर भागातील एम.जी. रोड आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरही निर्बंध असतील. वाय जंक्शन येथील वाहतूक बंद करून ती १५ ऑगस्ट चौकातून वळवण्यात येईल. तसेच महंमद रफी चौकाकडून येणारी वाहने ईस्ट स्ट्रीट मार्गे मार्गस्थ होतील. कोहिनूर हॉटेल परिसरातील वाहतूक भोपळे चौकाकडे वळवण्यात आली आहे.



भोसरी चाकण परिसरातही महत्त्वाचा रस्ता बंद



भोसरीतील हरिओम स्वीट चौक ते भोसरी ओव्हरब्रिज हा मार्ग बंद राहील. विदर्भ मित्र मंडळ आणि आळंदी रोड हा पर्यायी मार्ग असेल. चाकणमध्ये आंबेठाण चौक आणि मार्केट यार्ड परिसरातील रस्ते बंद असून, वाहनचालकांनी मेदनकरवाडी आणि शिक्रापूर रोडचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध