Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा एप्रिल २०२६ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे राज्य सरकारने विधानपरिषदेत स्पष्ट केले. आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर झालेल्या चर्चेत भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मेट्रो कामातील विलंब आणि वाढत्या खर्चाबाबत प्रशासनाला प्रश्न विचारला.


चर्चेदरम्यान प्रवीण दरेकर यांनी प्रकल्पातील त्रुटींकडे लक्ष वेधले. "मेट्रो-४ प्रकल्पाची मूळ मुदत जुलै २०२१ होती, जी आता ऑगस्ट २०२६ पर्यंत पुढे गेली आहे. या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च १२७४ कोटी रुपयांनी वाढला आहे. तसेच, मुलुंड आणि घाटकोपर येथील दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे," असे दरेकर यांनी नमूद केले. कांजूरमार्ग कारशेडच्या जागी मोगरपाडा (ठाणे) येथे कारशेड हलवल्याने कामाच्या गतीवर झालेला परिणाम लक्षात घेता, हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.


यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मेट्रो-४ च्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या कामाचे सविस्तर नियोजन सभागृहासमोर ठेवले. त्यांनी सांगितले की, "मेट्रो-४ प्रकल्पाचा फेज-१ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर फेज-२ डिसेंबर २०२६ पर्यंत आणि अंतिम फेज-३ नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे." तांत्रिक अडचणी आणि कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता कामाला वेग आला असून, मुंबईकर आणि ठाणेकरांना लवकरच या आधुनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळेल, असे सकारात्मक उत्तर सरकारने दिले आहे.

Comments
Add Comment

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर

सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व