Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा एप्रिल २०२६ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे राज्य सरकारने विधानपरिषदेत स्पष्ट केले. आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर झालेल्या चर्चेत भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मेट्रो कामातील विलंब आणि वाढत्या खर्चाबाबत प्रशासनाला प्रश्न विचारला.


चर्चेदरम्यान प्रवीण दरेकर यांनी प्रकल्पातील त्रुटींकडे लक्ष वेधले. "मेट्रो-४ प्रकल्पाची मूळ मुदत जुलै २०२१ होती, जी आता ऑगस्ट २०२६ पर्यंत पुढे गेली आहे. या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च १२७४ कोटी रुपयांनी वाढला आहे. तसेच, मुलुंड आणि घाटकोपर येथील दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे," असे दरेकर यांनी नमूद केले. कांजूरमार्ग कारशेडच्या जागी मोगरपाडा (ठाणे) येथे कारशेड हलवल्याने कामाच्या गतीवर झालेला परिणाम लक्षात घेता, हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.


यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मेट्रो-४ च्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या कामाचे सविस्तर नियोजन सभागृहासमोर ठेवले. त्यांनी सांगितले की, "मेट्रो-४ प्रकल्पाचा फेज-१ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर फेज-२ डिसेंबर २०२६ पर्यंत आणि अंतिम फेज-३ नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे." तांत्रिक अडचणी आणि कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता कामाला वेग आला असून, मुंबईकर आणि ठाणेकरांना लवकरच या आधुनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळेल, असे सकारात्मक उत्तर सरकारने दिले आहे.

Comments
Add Comment

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.

मुंबईसह महत्त्वाच्या शहरांत मिळणार गरमागरम ‘मत्स्य पाव’- मंत्री नितेश राणे

 मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; रोजगारनिर्मितीसाठी राबवणार मोबाईल फूड व्हॅन योजना मुंबई : राज्यातील

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पालक अधिकारी’ नेमणार;  मंत्री प्रताप सरनाईक

 मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग

SRH vs RR Eliminator : आज IPL मध्ये होणार सर्व्हायव्हल वॉर; राजस्थान विरुद्ध हैदराबादमध्ये निर्णायक लढत, हरला तो थेट स्पर्धेबाहेर!

IPL PLAYOFF : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज

Mumbai Railway Food Price Hike Cancelled : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! वडापाव, समोसा आणि पफचे दर जैसे थे

मुंबई : मध्य रेल्वेने १ जूनपासून वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव अखेर मागे घेतला

Central Railway Stations Food Stalls : मध्य रेल्वेच्या स्थानकांवर वडापाव, समोसा, भेळ महागणार; १ जूनपासून नवे दर लागू

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) उपनगरीय आणि प्रमुख स्थानकांवर मिळणारे लोकप्रिय स्नॅक्स आणि खाद्यपदार्थ १ जून