Artificial Flowers : कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्टता आणणार


मुंबई : राज्यातील लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढणारा कृत्रिम फुलांचा वापर पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने, अशा साहित्याचा वापर करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढून कारवाईबाबत स्पष्टता आणली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) विधानसभेत केली., कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्सवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे त्यांनी सांगितले.


भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनीही उपप्रश्नांद्वारे या समस्येचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कृत्रिम फुले आणि प्लास्टिक सजावटीच्या या साहित्यातील रसायनांमुळे डोकेदुखी, त्वचाविकार, डोळ्यांची जळजळ आणि लहान मुलांमध्ये श्वसनाचे त्रास उद्भवतात. दीर्घकालीन संपर्कामुळे कर्करोगाचा धोकाही संशोधनातून समोर आला आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.


ही फुले नद्या किंवा जलस्रोतांत विसर्जित केल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. तसेच, ही फुले पाळीव प्राण्यांच्या पोटात गेल्याने त्यांच्या पचनसंस्थेवरही गंभीर परिणाम होतात. कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचत आहे, असेही त्यांनी सांगितले.



डेकोरेटर्सवरही होणार कारवाई :


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "अनेकदा कृत्रिम फुलांचे साहित्य जलस्रोतांत टाकले जाते, जे अत्यंत घातक आहे. शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्ट तरतुदी केल्या जातील. जर लग्न समारंभात सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर झाला, तर संबंधित डेकोरेटरवरही कठोर कारवाई केली जाईल. आपण सनातन परंपरा मानणारे आहोत, त्यामुळे धार्मिक कार्यात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशा वेळी मुंबई पालिकेने नैसर्गिक फुलांची बाजारपेठ बंद केली असेल, ते ती सुरू करण्याबाबत आजच आदेश दिले जातील", असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार

मुंबई : आरक्षणाच्या पेचामुळे २२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या वगळता राज्यातील उर्वरित

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

नवेगाव-नागझिरा प्रकल्पाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका; १८५ गावांतील नागरिकांचा संभ्रम दूर

- वनमंत्री गणेश नाईक यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्राच्या