Artificial Flowers : कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्टता आणणार


मुंबई : राज्यातील लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढणारा कृत्रिम फुलांचा वापर पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने, अशा साहित्याचा वापर करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढून कारवाईबाबत स्पष्टता आणली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) विधानसभेत केली., कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्सवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे त्यांनी सांगितले.


भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनीही उपप्रश्नांद्वारे या समस्येचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कृत्रिम फुले आणि प्लास्टिक सजावटीच्या या साहित्यातील रसायनांमुळे डोकेदुखी, त्वचाविकार, डोळ्यांची जळजळ आणि लहान मुलांमध्ये श्वसनाचे त्रास उद्भवतात. दीर्घकालीन संपर्कामुळे कर्करोगाचा धोकाही संशोधनातून समोर आला आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.


ही फुले नद्या किंवा जलस्रोतांत विसर्जित केल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. तसेच, ही फुले पाळीव प्राण्यांच्या पोटात गेल्याने त्यांच्या पचनसंस्थेवरही गंभीर परिणाम होतात. कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचत आहे, असेही त्यांनी सांगितले.



डेकोरेटर्सवरही होणार कारवाई :


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "अनेकदा कृत्रिम फुलांचे साहित्य जलस्रोतांत टाकले जाते, जे अत्यंत घातक आहे. शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्ट तरतुदी केल्या जातील. जर लग्न समारंभात सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर झाला, तर संबंधित डेकोरेटरवरही कठोर कारवाई केली जाईल. आपण सनातन परंपरा मानणारे आहोत, त्यामुळे धार्मिक कार्यात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशा वेळी मुंबई पालिकेने नैसर्गिक फुलांची बाजारपेठ बंद केली असेल, ते ती सुरू करण्याबाबत आजच आदेश दिले जातील", असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Iran-US Peace Treaty : ४० दिवसांच्या संघर्षाची २१ तास चाललेली चर्चा निष्फळ; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली बहुचर्चित शांती चर्चा अखेर

IPL 2026 CSK vs DC : अखेर चेन्नईच्या विजयाचा श्रीगणेशा झालाच! संजू सॅमसन ठरला या हंगामातील पहिला शतकवीर

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ मधील १८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Iran-US Peace Treaty : अमेरिका-इराणचे शिष्टमंडळ दाखल, इराणच्या चार प्रमुख मागण्या

शस्त्रसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे