12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतरही, आरोपींनी २१ फेब्रुवारीला गणिताचा पेपर फोडल्याचे पुढे आले आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ शिवलिंग पटवे यांनी याला दुजोरा दिला आहे. शिक्षण मंडळ पोलिसांशी समन्वय साधून असल्याचे डॉ शिवलिंग पटवे यांनी सांगितले.



पेपर फोडल्याचे डिजिटल पुरावे समोर :


दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केला होता, पोलिसांनी तो डेटा रिकव्हर केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. १८ तारखेला हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला, तरीही २१ फेब्रुवारीला गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा सुद्धा पेपर फोडल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.



पेपरफुटीचे रॅकेट ?


दुसरीकडे, पाच सदस्यीय विशेष तपास पथककडून पेपर फुटी संदर्भात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. रसायन, भौतिकसोबत गणिताचाही पेपर फुटल्याने पेपरफुटीचे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.



आरोपी गजाआड :


पेपरफूट प्रकरणी पोलिसांनी (२३ फेब्रुवारी) सोमवारी आणखी २ आरोपींना अटक केली. जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद (रा. हसनबाग) आणि मुस्तफा खान (रा. भानखेडा) अशा या आरोपींची नावे असून हे दोघेही ट्यूशन क्लास संचालक आहेत.


यापूर्वी पोलिसांनी निशिकांत सुखदेव मून आणि फरहान अख्तर फहीम अख्तर यांना अटक केली होती. नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या मुलीच्या मोबाईलवरून १६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याच समोर आले होते. या प्रकरणात शिक्षक निशिकांत मून, एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान, जुनेद जावेद अटकेत आहे.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध