Holi Safety Tips And Tricks: होळीला बाजारात खरा रंग कसा ओळखायचा?

मुंबई: केमिकल रंगांचा वाढता धोका सगळीकडेच आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक आणि बनावट रंगांची मोठी आवक झाली आहे. केमिकल युक्त हे गडद रंग दिसायला आकर्षक असले तरी ते तिथकेच घातक ही आहेत. या रंगात शिसे (Lead), पारा, क्रोमियम आणि काचेचे बारीक कण मिसळलेले असतात. हे घटक केवळ त्वचेसाठीच नव्हे, तर डोळे आणि केसांसाठीही अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा रंगापासून दुर राहा. नाही तर रंगाचा बेरंग होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुले खरा आणि खोटा रंग कसा ओळखावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.



अशी करा अस्सल गुलालाची ओळख


1. वासावरून ओळखा:
नैसर्गिक किंवा सेंद्रिय गुलालचा वास अत्यंत सौम्य आणि फुलांसारखा असतो. जर गुलालातून पेट्रोल, रॉकेल किंवा तीव्र रासायनिक वास येत असेल, तर तो भेसळयुक्त समजावा.


2. पाण्यात विरघळून पहा:
थोडासा गुलाल पाण्यात टाका. जर तो पूर्णपणे विरघळला आणि तळाला काहीही उरले नाही, तर तो सुरक्षित असू शकतो. मात्र, काही कण तरंगत राहिल्यास तो वापरणे टाळा.


3. स्पर्श करून पहा:
अस्सल गुलाल हातावर चोळल्यास तो मऊ आणि बारीक लागतो. जर तो खरखरीत किंवा त्यात चमकणारे कण दिसले, तर तो काचेची पूड असलेला असू शकतो.


होळी खेळण्यापूर्वी घ्यायची काळजी
त्वचेचे संरक्षण करण्यासाठी होळी खेळण्यापूर्वी अंगाला खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावावे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी कॉन्टॅक्ट लेन्स टाळून चष्मा वापरावा. तसेच, पूर्ण बाह्यांचे कपडे घातल्यास रंगाचा थेट संपर्क टाळता येतो. रंग काढताना त्वचा जोरात न घासता बेसन, दही किंवा तेलाचा वापर करावा. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. कारण सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात भेसळ युक्त रंग विकण्यास आले आहेत. त्यात केमिकलचा वापर ही भरमसाट करण्यात आला आहे. त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे.


आरोग्यदायी होळीसाठी काही नियम नक्कीच आहे. ते प्रत्येकाने फॉलो करणे गरजेचे आहेत. होळी खेळताना पूर्ण कपडे घाला जेणेकरून शरीराचा कमीत कमी भाग उघडा राहील. केसांच्या संरक्षणासाठी तेल लावून बांधून ठेवा. रंग काढण्यासाठी त्वचा जोरात चोळू नका, त्याऐवजी बेसन आणि दह्याचे मिश्रण वापरा. पॅकेटवर घटक (Ingredients) तपासूनच खरेदी करा. नैसर्गिक रंग वापरून आपली आणि आपल्या प्रियजनांची होळी सुरक्षित आणि आनंददायी करा.

Comments
Add Comment

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने

मुंबई: महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची

RR VS DC : कर्णधार रियान परागलाच हटवले, वाचा कोण झाला नवा कर्णधार ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५२ वा सामना आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे. दुखापतीमुळे या सामन्यातून

महाराष्ट्राच्या विकासाच्या आलेखाची राष्ट्रीय स्तरावर दखल

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ 'बालस्नेही' आणि 'जलसमृद्धी'मध्ये राज्यातील ग्रामपंचायती देशात प्रथम नवी दिल्ली :

Nashik TCS Case : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला आयोगाने

Sindhudurg : सिंधुदुर्गात अवकाळीचे तांडव, ४१ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटांसह

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी