बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते' खुलासे

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची परीक्षा चालू आहे. लाखोंच्या संख्येने विविध राज्यातून विद्यार्थी पेपर देत आहेत. अशातच आपण नापास होणार या भीतीने घाबरून कल्याणमधील एका मुलीने आपले जीवन संपवले आहे.


कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात बुधवारी ही घटना उघडकीस आली. संबंधित विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेत होती. नुकतेच दिलेले पेपर अपेक्षेप्रमाणे न झाल्याची खंत तिच्या मनात होती. ‘आपण परीक्षेत नापास होऊ’ या भीतीसोबतच घरच्यांची नाराजी सहन करावी लागेल, या विचारांनी ती तणावाखाली होती, अशी माहिती समोर येत आहे.


परीक्षेच्या निकालाबाबत सतत मनात चाललेल्या भीतीमुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचली होती. याच अवस्थेत तिने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.



नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल


घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत विद्यार्थिनीने, “माझे पेपर चांगले गेले नाहीत. मला आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही,” असे शब्द लिहिले होते. या ओळींमधून तिच्या मनातील भीती आणि अपराधीपणाची भावना स्पष्ट होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


या घटनेमुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक दबाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुण, निकाल आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.

Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग