भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच केलेल्या एक दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे.


पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये एका तरुणीचे अपहरण केल्याचा दावा केला जात होता, विशेष म्हणजे या मुलीचं लग्न दोन दिवसांवर असताना तिचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. लग्नाची खरेदी करुन ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत घरी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं, यावेळी तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड देखील टाकण्यात आली असा दावा करण्यात येत होता. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत न्यायालयीन चौकशी ची मागणी केली. नंतर या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला , ज्या व्हिडीओमध्ये बोलताना या मुलीनं मोठा दावा केला होता. मी सबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून आले, आमचे प्रेमसंबंध आहेत, असं या मुलीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ते दोघेही पोलिसांसमोर हजर झाले. माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते.


इंदापूर न्यायालयात सुनावणी दरम्यान मुलीची आई देखील कोर्टात उपस्तिथ होती. मला माझी मुलगी द्या... अशी गयवया केली परंतु मुलीने आईकडे न पाहता आपल्या प्रियकराकडे गेली.


याप्रकरणी आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे, मुलगी आईसोबत जाण्यास तयार नसल्याने हिंदुत्ववादी संघटनेनें आक्रमक पवित्र घेतला. संतप्त नागरिकांनी पुणे - सोलापूर - राष्ट्रीय महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले. प्रियकराच्या अटकेची मागणी होऊ लागली. भिगवण बंद ची हाक देण्यात आली. गावकऱ्यांनी न्यायालयाला मुलीला सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर पुन्हा कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी मुलीला कोणाकडे जायचे असा प्रश्न पुन्हा विचारला असता अचानक मुलीने प्रियकराकडे न जाता आईकडे जाण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यामुळे लोक चक्रावून गेले आहेत.

Comments
Add Comment

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे