राज्यात वर्षभरात दीड हजार ड्रग्ज तस्करांना बेड्या

मुंबई : राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे दिवसेंदिवस अधिक विस्तारत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या वर्षभरात (२०२५) राज्यात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १ हजार ४५४ जणांना अटक करण्यात आली असून, एकूण १५ हजार ४०८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे.


राज्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक असून, २०२५ मध्ये अशा १३ हजार ९५४ व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात आले. याची सरासरी पाहिल्यास राज्यात दर महिन्याला अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १ हजार १६२ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अमली पदार्थांच्या सेवनाप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या १३ हजार ९५४ व्यक्तींपैकी ३ हजार २६८ जण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.


वर्षभरात अमली पदार्थांच्या वाहतुकीवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. तस्करी आणि वाहतूक केल्याप्रकरणी ३ हजार ६५९ गुन्हे दाखल झाले असून, त्यात ५ हजार ३०७ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संपूर्ण कारवायांमध्ये राज्यात तब्बल १ हजार ३४० कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.



मुंबई 'ड्रग हब' होण्याच्या मार्गावर?


राज्याची राजधानी मुंबई अमली पदार्थांचे केंद्र (हब) बनत असल्याचे चित्र या आकडेवारीवरून दिसत आहे. १ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२६ या अवघ्या ४२ दिवसांच्या कालावधीत मुंबईत तस्करीचे ९३ गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी ११२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ कोटी ९३ लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.



राज्यातील स्थिती (वर्ष २०२५)


- एकूण गुन्हे दाखल : १५,४०८
- अमली पदार्थ तस्करी (अटक) : १,४५४
- अमली पदार्थ सेवन (गुन्हे) : १३,९५४
- जप्त मुद्देमाल : १,३४० कोटी ४१ लाख रुपये
- फरार आरोपी (सेवन प्रकरणी) : ३,२६८

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०