राज्यात वर्षभरात दीड हजार ड्रग्ज तस्करांना बेड्या

मुंबई : राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे दिवसेंदिवस अधिक विस्तारत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या वर्षभरात (२०२५) राज्यात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १ हजार ४५४ जणांना अटक करण्यात आली असून, एकूण १५ हजार ४०८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे.


राज्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक असून, २०२५ मध्ये अशा १३ हजार ९५४ व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात आले. याची सरासरी पाहिल्यास राज्यात दर महिन्याला अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १ हजार १६२ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अमली पदार्थांच्या सेवनाप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या १३ हजार ९५४ व्यक्तींपैकी ३ हजार २६८ जण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.


वर्षभरात अमली पदार्थांच्या वाहतुकीवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. तस्करी आणि वाहतूक केल्याप्रकरणी ३ हजार ६५९ गुन्हे दाखल झाले असून, त्यात ५ हजार ३०७ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संपूर्ण कारवायांमध्ये राज्यात तब्बल १ हजार ३४० कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.



मुंबई 'ड्रग हब' होण्याच्या मार्गावर?


राज्याची राजधानी मुंबई अमली पदार्थांचे केंद्र (हब) बनत असल्याचे चित्र या आकडेवारीवरून दिसत आहे. १ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२६ या अवघ्या ४२ दिवसांच्या कालावधीत मुंबईत तस्करीचे ९३ गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी ११२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ कोटी ९३ लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.



राज्यातील स्थिती (वर्ष २०२५)


- एकूण गुन्हे दाखल : १५,४०८
- अमली पदार्थ तस्करी (अटक) : १,४५४
- अमली पदार्थ सेवन (गुन्हे) : १३,९५४
- जप्त मुद्देमाल : १,३४० कोटी ४१ लाख रुपये
- फरार आरोपी (सेवन प्रकरणी) : ३,२६८

Comments
Add Comment

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे

शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने सज्ज आणि सक्षम