Pune Airport: हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवा रद्द

पुणे: थायलंडच्या सहलीचं नियोजन करणाऱ्या पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने आपल्या आगामी उन्हाळी हंगामातील पुणे-बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकातून इंडिगोने या मार्गावरील बुकिंग पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठा धक्का बसला आहे.



सेवा रद्द करण्याचे कारण?



इंडिगोने या निर्णयामागे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. कंपनीने केवळ 'कामकाजातील बदल' असे उत्तर दिले आहे. परंतु, हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या मार्गावर प्रवाशांच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नव्हता. सततच्या कमी प्रतिसादामुळे ही सेवा चालवणे कंपनीला व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांनी या सेक्टरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.


आता पुण्याहून बँकॉकला जाण्यासाठी केवळ 'एअर इंडिया एक्सप्रेस' ही एकच कंपनी उपलब्ध असेल. त्यामुळे, या मार्गावर एकाच कंपनीची मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे विमान तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढतील अशी अपेक्षा होती. पण चालू सेवा बंद पडणे हे पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी चिंताजनक आहे.


हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितलं की, "विमान कंपन्या प्रत्येक हंगामात प्रवाशांच्या प्रतिसादाचा आढावा घेतात. जर एखाद्या मार्गावर पुरेसे प्रवासी मिळत नसतील, तर व्यावसायिक कारणास्तव सेवा रद्द केली जाते. कदाचित ही कंपनी आता दुसऱ्या फायदेशीर मार्गावर आपली विमाने वळवेल."


सध्या पुणे विमानतळावरून दुबई, अबुधाबी आणि बँकॉक या तीनच आंतरराष्ट्रीय शहरांसाठी सेवा उपलब्ध आहेत. इंडिगोच्या या निर्णयामुळे पर्यटनासाठी बँकॉकला जाणाऱ्या पुणेकरांच्या खिशाला आता मोठी कात्री लागण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

Latur: वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात दिला बारावीचा पेपर; शिवानीची जिद्द मनाला चटका लावून गेली

लातूर: लातूरमधील एका १७ वर्षीय मुलीच्या जिद्दीला सलाम करणारी घटना समोर आली आहे. या मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली

Maharashtra Agri AI : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले महाराष्ट्र ‘अॅग्री एआय पॉलिसी’चे कौतुक

मुंबई : महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र ‘अ‍ॅग्री एआय पॉलिसी’ स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचे

Buldhana News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; गावात संचारबंदी लागू

बुलढाणा : बुलढाणा मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. याच

Maharashtra Unseasonal Rain: महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

मुंबई: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, गोंदिया

Police: सरकारचा मोठा निर्णय; ५१ हजार पोलिसांना लागू होणार नवा नियम

मुंबई: पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस

साखरपुड्यानंतर ४ दिवसांत जोडप्याचा दुर्दैवी अंत; धाराशिवमध्ये कारचा भीषण अपघात

धाराशिव : लग्नसमारंभाला अवघे काही दिवस बाकी असताना दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. धाराशिव जिल्ह्यातील