Maharashtra Agri AI : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले महाराष्ट्र ‘अॅग्री एआय पॉलिसी’चे कौतुक

मुंबई : महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र ‘अ‍ॅग्री एआय पॉलिसी’ स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले.


‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणांतर्गत येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक परिमल सिंह, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर आदी उपस्थित होते.


भारताने एआय क्षेत्रात केलेली प्रगती दिल्ली येथे झालेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये अधोरेखित झाली आहे. भारताच्या एआय क्षेत्रातील कामगिरीचे जागतिक स्तरावर कौतुक झाले असून आयएमएफच्या प्रमुखांनी भारताची प्रगती अतिशय उल्लेखनीय असल्याचे नमूद केले आहे. यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एआय फॉर ॲग्री परिषदेचे केलेले यशस्वी आयोजन नक्कीच कौतुकास्पद आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री सिंह यांनी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाची प्रशंसा केली.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एआयला नैतिकता, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वसमावेशकतेशी जोडले आहे. कृषी क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर सुरू असून पीक उत्पादनाचा अंदाज, योग्य पिकांची निवड, हवामान अंदाज, रोगांचे लवकर निदान आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. देशातील विविध भागांतील शेतकऱ्यांसाठी २२ भारतीय भाषांमध्ये एआय आधारित तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


शेतकऱ्यांसाठी ‘एआय ओपन स्टॉक फॉर फार्मर्स’ तसेच कृषी क्षेत्रातील सर्व एआय करिता एकत्रित व्यासपीठ उभारण्यात येत आहे. सॉइल हेल्थ कार्ड, स्वामित्व योजना, ड्रोन मॅपिंग, हवामान अंदाजासाठी स्वतंत्र मिशन आणि जैवतंत्रज्ञान धोरणाद्वारे शेती अधिक सक्षम केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Update : मुंबईत मुसळधार, कोकणात ऑरेंज अलर्ट! राज्यातील २३ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; पुढील ३ दिवस हवामान कसं असेल?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. मुंबई,

Thailand Job Scam News: प्लिज..! आम्हाला वाचवा; थायलंडमध्ये अडकलेल्या तरुणांचे बेहाल, नेमकं काय प्रकरण?

महाराष्ट्रातील ३० जण गोल्डन ट्रँगलच्या जाळ्यात? परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून

Farm Loan Waiver : ५ जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार

- कृषीमंत्री दत्ता भरणे; ५६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील बहुप्रतीक्षित शेतकरी

Ketan Agarwal Murder : एका पँटने उघडलं केतनच्या हत्येचं गुपित, चेतनच्या कपड्यांवरून तपासाला नवे वळण

पुणे :  पुण्यातील (Pune) उद्योगपती केतन अग्रवाल हत्या (Ketan Agarwal Murder) प्रकरणात तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर

Nasrapur Rape Case : नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या फाशीची तत्काळ अंमलबजावणी करा

५५ दिवसात दोषारोप सिद्ध करून आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीकडून महायुती सरकार, पोलीस

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पावशीजवळ कार-पिकअपची समोरासमोर धडक

भीषण अपघातात चालक गंभीर जखमी  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर पावशी (Pawashi) येथील बेल