Praful Patel : होय, अजित पवारांना निधनाच्या आदल्या दिवशी फोन केला होता! प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले बोलणे

मुंबई : "निधनाच्या आदल्या दिवशी मी अजितदादांना दिल्लीतून फोन केला होता, पण तो शेतकऱ्यांच्या कामासाठी होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांना अनेक लोक फोन करत असतात. मी त्यांना कुठल्याही कारणाने थांबवण्याचे काम केलेले नाही. मी दिल्लीत असताना ते नेमके कुठे आहेत, याची मला कल्पना नव्हती," असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी दिले.


माध्यमांशी संवाद साधताना पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. "दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही पक्षाची जबाबदारी आहे", असे त्यांनी नमूद केले.



'विलीनीकरणाची ही वेळ नाही'


विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना पटेल म्हणाले की, "अजितदादांच्या निधनानंतर ही वेळ विलीनीकरणावर चर्चा करण्याची नाही. आज आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमची संघटनात्मक पदे किंवा विधिमंडळ नेतृत्वाची रिक्त झालेली जागा भरण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत."



विमान कंपनीवर फोडले खापर


अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना प्रफुल पटेल यांनी थेट विमान कंपनीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. "या दुर्दैवी घटनेत विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे. पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल, तर ते सीबीआय चौकशीत समोर येईलच; मात्र सकृतदर्शनी विमान कंपनी या दुर्घटनेला मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मला वाटते," असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल तपासणी होणे आवश्यक असून, राज्य सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.



रोहित पवारांच्या आरोपांवर भाष्य टाळले


"पायलटने विमान मुद्दाम खाली पाडले," असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याबाबत उत्तर देताना पटेल म्हणाले, "मी एक जबाबदार व्यक्ती असून सरकारमधील प्रदीर्घ अनुभवामुळे मी जे काही बोलेन ते तथ्यांच्या आधारेच बोलेन. पुराव्याशिवाय कोणत्याही आरोपांना उत्तर देणे मला योग्य वाटत नाही."

Comments
Add Comment

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र

Unauthorized Schools : मुंबईतील १६४ अनधिकृत शाळा नोटीस देवूनही सुरुच , संस्थाचालकांवर कारवाई करा

शिक्षण समितीच्या बैठकीत उमटले तीव्र पडसाद मुंबई : मुंबईतील अनधिकृत ठरलेल्या १६४ शाळांपैंकी ६५ शाळा या केवळ

KEM Hospital : केईएम रुग्णालयात रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न... सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांनी घटनास्थळी केली पाहणी

मुंबई : महानगरपालिकेच्या के.ई.एम. हॉस्पिटल येथे शुक्रवारी सकाळी घटनेत घटनेत 27 वर्षीय एका रुग्णाने आत्महत्येचा

Dialysis facility : पश्चिम उनगरातील ३ आणि पूर्व उपनगरातील २ रुग्णालयात डायलेसिसची सुविधा

मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येत असून