Praful Patel : होय, अजित पवारांना निधनाच्या आदल्या दिवशी फोन केला होता! प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले बोलणे

मुंबई : "निधनाच्या आदल्या दिवशी मी अजितदादांना दिल्लीतून फोन केला होता, पण तो शेतकऱ्यांच्या कामासाठी होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांना अनेक लोक फोन करत असतात. मी त्यांना कुठल्याही कारणाने थांबवण्याचे काम केलेले नाही. मी दिल्लीत असताना ते नेमके कुठे आहेत, याची मला कल्पना नव्हती," असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी दिले.


माध्यमांशी संवाद साधताना पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. "दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही पक्षाची जबाबदारी आहे", असे त्यांनी नमूद केले.



'विलीनीकरणाची ही वेळ नाही'


विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना पटेल म्हणाले की, "अजितदादांच्या निधनानंतर ही वेळ विलीनीकरणावर चर्चा करण्याची नाही. आज आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमची संघटनात्मक पदे किंवा विधिमंडळ नेतृत्वाची रिक्त झालेली जागा भरण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत."



विमान कंपनीवर फोडले खापर


अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना प्रफुल पटेल यांनी थेट विमान कंपनीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. "या दुर्दैवी घटनेत विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे. पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल, तर ते सीबीआय चौकशीत समोर येईलच; मात्र सकृतदर्शनी विमान कंपनी या दुर्घटनेला मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मला वाटते," असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल तपासणी होणे आवश्यक असून, राज्य सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.



रोहित पवारांच्या आरोपांवर भाष्य टाळले


"पायलटने विमान मुद्दाम खाली पाडले," असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याबाबत उत्तर देताना पटेल म्हणाले, "मी एक जबाबदार व्यक्ती असून सरकारमधील प्रदीर्घ अनुभवामुळे मी जे काही बोलेन ते तथ्यांच्या आधारेच बोलेन. पुराव्याशिवाय कोणत्याही आरोपांना उत्तर देणे मला योग्य वाटत नाही."

Comments
Add Comment

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे

Devendra Fadnavis : ५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा

Chief Minister Devendra Fadnavis : 'बेस्ट'च्या पुनरुज्जीवनासाठी 'भाडेपट्टा मॉडेल'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; २२ डेपोंच्या १२३ एकर जागेचा समावेश, पीपीपी तत्त्वावर होणार विकास मुंबई : मुंबईची

Former President Dr.Kalam : माजी राष्ट्रपती डॉ. कलामांचे नाव पुसून आयटीआयला हाजी बाबांचे नाव द्या!

काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा प्रस्ताव; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रस्ताव फेटाळला मुंबई : भारताचे माजी

Aarey Colony : आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख झाडे लावणार

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून