Praful Patel : होय, अजित पवारांना निधनाच्या आदल्या दिवशी फोन केला होता! प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले बोलणे

मुंबई : "निधनाच्या आदल्या दिवशी मी अजितदादांना दिल्लीतून फोन केला होता, पण तो शेतकऱ्यांच्या कामासाठी होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांना अनेक लोक फोन करत असतात. मी त्यांना कुठल्याही कारणाने थांबवण्याचे काम केलेले नाही. मी दिल्लीत असताना ते नेमके कुठे आहेत, याची मला कल्पना नव्हती," असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी दिले.


माध्यमांशी संवाद साधताना पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. "दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही पक्षाची जबाबदारी आहे", असे त्यांनी नमूद केले.



'विलीनीकरणाची ही वेळ नाही'


विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना पटेल म्हणाले की, "अजितदादांच्या निधनानंतर ही वेळ विलीनीकरणावर चर्चा करण्याची नाही. आज आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमची संघटनात्मक पदे किंवा विधिमंडळ नेतृत्वाची रिक्त झालेली जागा भरण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत."



विमान कंपनीवर फोडले खापर


अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना प्रफुल पटेल यांनी थेट विमान कंपनीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. "या दुर्दैवी घटनेत विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे. पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल, तर ते सीबीआय चौकशीत समोर येईलच; मात्र सकृतदर्शनी विमान कंपनी या दुर्घटनेला मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मला वाटते," असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल तपासणी होणे आवश्यक असून, राज्य सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.



रोहित पवारांच्या आरोपांवर भाष्य टाळले


"पायलटने विमान मुद्दाम खाली पाडले," असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याबाबत उत्तर देताना पटेल म्हणाले, "मी एक जबाबदार व्यक्ती असून सरकारमधील प्रदीर्घ अनुभवामुळे मी जे काही बोलेन ते तथ्यांच्या आधारेच बोलेन. पुराव्याशिवाय कोणत्याही आरोपांना उत्तर देणे मला योग्य वाटत नाही."

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा शनिवार, रविवार मेगा ब्लॉक; उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार तसेच परळ आणि करी रोड

महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होताच आश्विनी भिडे यांनी घेतला धाडसी निर्णय

ई-ऑफिस,पेपरलेस करण्याचे सर्व खात्यांना दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी

पश्चिम रेल्वेवर आज वांद्रे येथे 'मेजर ब्लॉक'

मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान 'जम्बो ब्लॉक मुंबई : वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान असलेल्या मोऱ्या

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची