मध्य रेल्वेचा शनिवार, रविवार मेगा ब्लॉक; उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार तसेच परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यान प्रभादेवी येथील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) पाडण्याच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय तसेच मेल-एक्स्प्रेस रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान प्लॅटफॉर्म विस्तारासाठी ४ ते ५ एप्रिल दरम्यानच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ५ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत लागू राहील. या काळात मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली या दरम्यानच्या अप व डाऊन धीम्या मार्गांवरील सेवा बाधित राहतील. परिणामी, ठाणे आणि डोंबिवली स्थानकांसाठीच्या अनेक उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या अर्ध्या मार्गातच थांबवण्यात येतील.


याचबरोबर, प्रभादेवी येथील आरओबी पॅनल्स काढण्याच्या कामासाठी ४ एप्रिल रोजी रात्री ११:१५ ते ५ एप्रिल रोजी पहाटे ५:४५ या कालावधीत दादर ते भायखळा दरम्यान सर्व मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरदरम्यानच्या उपनगरीय सेवा ४ एप्रिल रोजी रात्री १०:३० पासून ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. ४ एप्रिल रोजी रात्री १०:४९ पासून ते ५ एप्रिल रोजी सकाळी ९:०५ पर्यंतच्या डाऊन धीम्या गाड्या मुलुंड आणि कल्याणदरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील. त्यामुळे या गाड्या कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. त्याचप्रमाणे, कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्याही काही वेळासाठी जलद मार्गावर वळवण्यात येतील.


याशिवाय, ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन जलद गाड्यांना कळवा, मुंब्रा आणि दिवा या अतिरिक्त स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. तरीही, सर्व गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा साधारण १५ मिनिटे उशिराने धावतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मेल व एक्स्प्रेस गाड्यांवरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार, ठाणे आणि कल्याणदरम्यान पाचव्या मार्गावरून वळवण्यात येतील. तसेच, सीएसएमटीकडे येणाऱ्या अप गाड्या सहाव्या मार्गावरून वळवल्या जातील.


काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशनही करण्यात आले आहे. ४ आणि ५ एप्रिल रोजी धावणाऱ्या गोरखपूर-सीएसएमटी, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस यांसारख्या गाड्या ठाणे येथेच थांबवण्यात येणार आहेत, तर मडगावहून येणाऱ्या तेजस, मांडवी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या पनवेल येथेच थांबवण्यात येतील. त्याचप्रमाणे, काही गाड्या पनवेल आणि दादर येथूनच सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये कोकण कन्या एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेसचा समावेश आहे. ५ एप्रिल रोजी सुटणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले असून वंदे भारत, महानगर एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्या उशिराने सुटतील. ब्लॉकमुळे ४ एप्रिल रोजी धावणाऱ्या काही गाड्यांचे २० ते ४० मिनिटे नियमन करण्यात येणार आहे. यामध्ये बल्लारशाह-सीएसएमटी, कोकण कन्या एक्स्प्रेस आणि चेन्नई-सीएसएमटी एक्स्प्रेसचा समावेश आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पायाभूत सुविधांची देखभाल, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी हे ब्लॉक्स अत्यावश्यक आहेत. तरीही, यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली असून प्रवाशांनी पर्यायी प्रवासाची योजना आखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य