‘शिवजयंती निमित्त, विलेपार्ले येथे शिवकल्याण राजा’

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीतांचा भव्य कार्यक्रम


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ‘शिवकल्याण राजा’ या गाजलेल्या ध्वनिफितीला ५२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने विशेष गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर स्वतः या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिफीत शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारली असून, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली आहे. स्व. लता मंगेशकर यांनी गायन केलेल्या या अमर काव्यकृतीने शिवभक्तांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. या ऐतिहासिक कलाकृतीच्या सुवर्णक्षणांचा पुनःअनुभव देण्यासाठी हा कार्यक्रम सादर होत आहे.


कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. गायक-गायिका म्हणून विभावरी आपटे, मनीषा निश्चल, अजित परब आणि ऋतुजा तारे हे कलावंत आपल्या सुमधुर आवाजात शिवगौरव गीते सादर करणार आहेत. तसेच वादक कलाकारांमध्ये विवेक परांजपे, डॉ. राजेंद्र दुरकर , अजय अत्रे, अपूर्व द्रविड, सचिन इंगळे, केदार परांजपे, विशाल गंड्रतरवार, विक्रम भट आणि ऋतुराज कोरे यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम संयोजनाची जबाबदारी मंदार कार्णिक व प्रसाद महाडकर यांनी स्वीकारली आहे.


हा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. प्रवेश विनामूल्य आहे.


सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून शिवगौरव गीतांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात