Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन होणार नाही याची काटेकोर खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.


रायगड जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन अंतर्गत मौजे श्रीवर्धन मतदारसंघातील दगडखाणींसंदर्भात महसूलमंत्री दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.


खाण मालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, ज्यांनी पर्यावरणीय परवानगीसाठी अर्ज केला आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अशा खाण मालकांकडून 'पुढील तीन महिन्यांच्या आत ही परवानगी मिळवू' असे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन त्यांना तात्पुरती उत्खनन परवानगी देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. तसेच शासनस्तरावर पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचे आदेशही त्यांनी दिले.


उत्खननाला परवानगी देतानाच महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला अवैध प्रकारांबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला. "जेवढा परवाना दिला आहे, तेवढ्याच मर्यादेत उत्खनन होत आहे का, याची काटेकोर पडताळणी करावी. कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन होणार नाही, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी," असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच