Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.


दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची २०० वी जयंती तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३५ वी जयंती देशभर साजरी केली जाणार आहे. त्यामुळेच समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मुल्यांवर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या महामानवांचे कार्य व विचार घेऊन काम करत आहे. म्हणून पक्षाच्यावतीने राज्यभर संघटनात्मक पातळीवर प्रभावीपणे जयंती साजरी केली जाणार आहे.


प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे त्याठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करतील तर पक्षाच्या कार्यालयात दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात येईल तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा, तालुका, शहर व गाव स्तरावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.


महामानवांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी व्याख्यान, परिसंवाद, किंवा विचारमंथन कार्यक्रम आयोजित करण्यात यणार आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान