Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला मतदान केंद्रीय आयोगाकडून घोषणा; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, या सर्व ३७ जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या ७ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील, डॉ. फौजिया खान आणि धैर्यशील पाटील या नेत्यांचा समावेश आहे.


राज्यातील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी (मविआ) अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. विधानसभेत भाजपकडे १३२, शिवसेनेकडे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) ४१ असे महायुतीचे भक्कम संख्याबळ आहे. याउलट, उबाठा गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवार गटाकडे केवळ १० आमदार आहेत. या आकडेवारीनुसार, महायुती सातपैकी सहा जागा सहज जिंकू शकते. उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीला आपल्या तिन्ही घटक पक्षांची मते एकवटून मोठी कसरत करावी लागणार आहे.




निवडणूक कार्यक्रम असा...


- अधिसूचना जारी होणे :२६ फेब्रुवारी २०२६
- अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ५ मार्च २०२६
- अर्जांची छाननी : ६ मार्च २०२६
- अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ मार्च २०२६
- मतदान व मतमोजणी : १६ मार्च २०२६ (सकाळी ९ ते ४ मतदान; सायंकाळी ५ वाजता मतमोजणी)


शरद पवार पुन्हा रिंगणात?


निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये प्रियांका चतुर्वेदी (उबाठा) आणि रजनी पाटील (काँग्रेस) यांच्या पुनर्निवडीवर टांगती तलवार आहे, कारण त्यांच्या पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नाही. अशा स्थितीत ६० वर्षांहून अधिक काळाचा संसदीय अनुभव असलेले शरद पवार यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मविआतील मित्रपक्ष आपल्या जागांचा त्याग करून पवार यांच्या नावावर एकमत करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर मविआत समन्वयाचा अभाव राहिला, तर महायुती या निवडणुकीतही 'क्लीन स्वीप' देईल, असे बोलले जात आहे.

कुठे किती जागांसाठी निवडणूक


महाराष्ट्रासह इतर ९ राज्यांमध्येही राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), बिहार (५), ओदिशा (४), आसाम (३), हरियाणा (२), छत्तीसगड (२), तेलंगणा (२) आणि हिमाचल प्रदेश (१) या राज्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)