Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला मतदान केंद्रीय आयोगाकडून घोषणा; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, या सर्व ३७ जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या ७ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील, डॉ. फौजिया खान आणि धैर्यशील पाटील या नेत्यांचा समावेश आहे.


राज्यातील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी (मविआ) अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. विधानसभेत भाजपकडे १३२, शिवसेनेकडे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) ४१ असे महायुतीचे भक्कम संख्याबळ आहे. याउलट, उबाठा गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवार गटाकडे केवळ १० आमदार आहेत. या आकडेवारीनुसार, महायुती सातपैकी सहा जागा सहज जिंकू शकते. उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीला आपल्या तिन्ही घटक पक्षांची मते एकवटून मोठी कसरत करावी लागणार आहे.




निवडणूक कार्यक्रम असा...


- अधिसूचना जारी होणे :२६ फेब्रुवारी २०२६
- अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ५ मार्च २०२६
- अर्जांची छाननी : ६ मार्च २०२६
- अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ मार्च २०२६
- मतदान व मतमोजणी : १६ मार्च २०२६ (सकाळी ९ ते ४ मतदान; सायंकाळी ५ वाजता मतमोजणी)


शरद पवार पुन्हा रिंगणात?


निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये प्रियांका चतुर्वेदी (उबाठा) आणि रजनी पाटील (काँग्रेस) यांच्या पुनर्निवडीवर टांगती तलवार आहे, कारण त्यांच्या पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नाही. अशा स्थितीत ६० वर्षांहून अधिक काळाचा संसदीय अनुभव असलेले शरद पवार यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मविआतील मित्रपक्ष आपल्या जागांचा त्याग करून पवार यांच्या नावावर एकमत करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर मविआत समन्वयाचा अभाव राहिला, तर महायुती या निवडणुकीतही 'क्लीन स्वीप' देईल, असे बोलले जात आहे.

कुठे किती जागांसाठी निवडणूक


महाराष्ट्रासह इतर ९ राज्यांमध्येही राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), बिहार (५), ओदिशा (४), आसाम (३), हरियाणा (२), छत्तीसगड (२), तेलंगणा (२) आणि हिमाचल प्रदेश (१) या राज्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र

Unauthorized Schools : मुंबईतील १६४ अनधिकृत शाळा नोटीस देवूनही सुरुच , संस्थाचालकांवर कारवाई करा

शिक्षण समितीच्या बैठकीत उमटले तीव्र पडसाद मुंबई : मुंबईतील अनधिकृत ठरलेल्या १६४ शाळांपैंकी ६५ शाळा या केवळ

KEM Hospital : केईएम रुग्णालयात रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न... सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांनी घटनास्थळी केली पाहणी

मुंबई : महानगरपालिकेच्या के.ई.एम. हॉस्पिटल येथे शुक्रवारी सकाळी घटनेत घटनेत 27 वर्षीय एका रुग्णाने आत्महत्येचा

Dialysis facility : पश्चिम उनगरातील ३ आणि पूर्व उपनगरातील २ रुग्णालयात डायलेसिसची सुविधा

मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येत असून

Mumbai : मुंबई महापालिकेच्यावतीने विद्यार्थीनींसाठी कांदिवलीत वसतीगृह

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथे नोकरदार महिलांसाठी वसतीगृह सुरु करण्यात

Education : 'महापालिकेचे शालेय भूखंड खासगी संस्थांना देऊच नका'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमांतून शाळांच्या मोकळ्या जागा या खासगी