Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला मतदान केंद्रीय आयोगाकडून घोषणा; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, या सर्व ३७ जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या ७ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील, डॉ. फौजिया खान आणि धैर्यशील पाटील या नेत्यांचा समावेश आहे.


राज्यातील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी (मविआ) अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. विधानसभेत भाजपकडे १३२, शिवसेनेकडे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) ४१ असे महायुतीचे भक्कम संख्याबळ आहे. याउलट, उबाठा गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवार गटाकडे केवळ १० आमदार आहेत. या आकडेवारीनुसार, महायुती सातपैकी सहा जागा सहज जिंकू शकते. उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीला आपल्या तिन्ही घटक पक्षांची मते एकवटून मोठी कसरत करावी लागणार आहे.




निवडणूक कार्यक्रम असा...


- अधिसूचना जारी होणे :२६ फेब्रुवारी २०२६
- अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ५ मार्च २०२६
- अर्जांची छाननी : ६ मार्च २०२६
- अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ मार्च २०२६
- मतदान व मतमोजणी : १६ मार्च २०२६ (सकाळी ९ ते ४ मतदान; सायंकाळी ५ वाजता मतमोजणी)


शरद पवार पुन्हा रिंगणात?


निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये प्रियांका चतुर्वेदी (उबाठा) आणि रजनी पाटील (काँग्रेस) यांच्या पुनर्निवडीवर टांगती तलवार आहे, कारण त्यांच्या पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नाही. अशा स्थितीत ६० वर्षांहून अधिक काळाचा संसदीय अनुभव असलेले शरद पवार यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मविआतील मित्रपक्ष आपल्या जागांचा त्याग करून पवार यांच्या नावावर एकमत करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर मविआत समन्वयाचा अभाव राहिला, तर महायुती या निवडणुकीतही 'क्लीन स्वीप' देईल, असे बोलले जात आहे.

कुठे किती जागांसाठी निवडणूक


महाराष्ट्रासह इतर ९ राज्यांमध्येही राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), बिहार (५), ओदिशा (४), आसाम (३), हरियाणा (२), छत्तीसगड (२), तेलंगणा (२) आणि हिमाचल प्रदेश (१) या राज्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

BMC : महापालिकेला अखेर आठवले दुषित पाणी आणि गळती

- पाणी गळती शोधून काढण्यासाठी पथके तैनात करण्याचेही बांगरांनी दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींचा मार्ग मोकळा

- महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणार अभय योजना - सन १७ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या इमारतींना मिळणार लाभ सचिन

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे

Kishori Pednekar: विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या पेडणेकर आधीच पोहोचल्या नाल्याच्या काठावर

मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या

प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया सुलभ करा; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले मालमत्ता विभागाला निर्देश

मुंबई: मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून

Ashwini Bhide: गारगाईसह समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती द्या; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे जलखात्याला आदेश

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४००