Kishori Pednekar: विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या पेडणेकर आधीच पोहोचल्या नाल्याच्या काठावर

मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात नालेसफाई आठवली. मिठी नदीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होवून एक ते दोन दिवस होत नाही तोच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मिठी नदीच्या गाळ सफाईची पाहणी केली. मुळात नालेसफाईचे काम ६० ते ७० टक्के झाल्यानंतर पाहणी करणाऱ्या एकेकाळच्या सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षात बसताच मिठी नदीच्या सफाईची आठवण एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवडयात झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्या सत्ताकाळात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना नाल्यातील गाळाची पाहणी करण्याची एवढी काय घाई असा सवाल आता मुंबईकरांकडून केला जात आहे.


मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे यांच्यासह गुरुवारी मिठी नदीच्या गाळाची सफाईची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे करण्यात येणाऱ्या मिठी नदी स्वच्छता व नालेसफाई कामांची पाहणी केली. यावर्षी कामे उशिरा सुरु झाल्यामुळे प्रत्यक्ष स्थळी जावून कामांचा आढावा घेतला आणि कामे योग्य वेळेत व नियोजनबध्द पध्दतीने पूर्ण व्हावीत यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या असे त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टवर म्हटले आहे.


विशेष म्हणजे मागील २५ वर्षांपासून म्हणजे ७ मार्च २०२२पर्यंत मुंबई महापालिकेत उबाठाची सत्ता होती. परंतु नालेसफाईच्या कामांचे कंत्राट दिल्यानंतर कधीही नाले तसेच मिठी नदीच्या कामांच्या ठिकाणी जावून ही कामे योग्य वेळेत आणि नियोजनबध्द पध्दतीने करण्याच्या सूचना त्यांनी कंत्राटदारांना दिल्या नव्हत्या. परंतु आता विरोधी पक्षात बसताच त्यांना या सफाईच्या कामाला सुरुवात होताच नाले आणि मिठी नदीच्या काठावर जावे लागले. परंतु आपल्या सत्ता काळात सफाईचे काम ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्यानंतर आणि जिथे अधिकारी सांगतील तिथेच जावून कशाप्रकारे योग्यप्रमाणे सफाई केली जाते,हे माध्यमांना तिथे नेवून सांगणाऱ्या किशोरी पेडणेकर यांच्यासह तत्कालिन उबाठाचे महापालिकेतील नेते यांना नालेसफाई आणि मिठी नदीचे काम कधीपर्यंत पूर्ण केले जाते याची कल्पना नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची अतिघाई ही मुंबईकरांना यंदा पुरात लोटले जाणार नाही या चिंतेपोटी आहे की कंत्राटदाराला दमात घेवून त्यांनी काम करू नये यासाठी आहे की गाळातील सफाईत यंदा काही मिळणार नाही या चिंतेपोटी आहे असा सवाल आता अप्रत्यक्ष नागरिकांकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य