Narhari Zirwal: सुनेत्रा पवार नरहरी झिरवळांवर नाराज; म्हणाल्या...

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ यांचं नाव सातत्याने चर्चेत आहे. अशातच आता त्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नरहरी झिरवाळ यांना सुनावलं आहे. यावरून त्या त्यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.



नेमकं प्रकरण काय ?


अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आले. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.


या सर्व प्रकारानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या झिरवाळ यांच्या कारभारावर प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाचलुचपत प्रकरणामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. साहजिक या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी झाली होती. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांच्यासमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.



पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या :


स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवाळ यांना केल्याचे सांगितले जाते. अन्न आणि औषध खात्याच्या कर्मचाऱ्याला एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर वेगाने कारवाई सुरु झाली होती. त्यानंतर नरहरी झिरवळ अज्ञातवासात गेले होते. त्यांचा फोन स्वीच ऑफ असल्याने ते जवळपास नॉट रिचेबल होते. मात्र, याप्रकरणाची प्रचंड चर्च व्हायला लागल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समितीची तातडीची बैठक बोलावली होती. त्यानुसार काल देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली.

Comments
Add Comment

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन वर्षांत 'युएई' आणि सिंगापूरपेक्षा मोठी होणार'

देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्रच मुंबई : महाराष्ट्राचा जीडीपी २०१३ - १४ मध्ये १६ लाख कोटी

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

जमीन भूसंपादन प्रकरणात एसआयटी चौकशीचे महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय