२० वर्षीय फार्मसीच्या मुलाची आत्महत्या; चिट्ठीत केले असे काही भयानक खुलासे

मुंबई : आजकालची मुलं अपमान अगदी सहजरित्या सहन नाही करू शकत, कोणी त्या अपमानाला सडेतोड उत्तर देत तर कोणी आपलं जीवनच संपवत, आपल्या इज्जतीसमोर आत्महत्या हा पर्याय मुलांना खूप सोप्पा वाटतो.. अश्याच एक अपमानातून आणि नैराश्यातून एका मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.



नेमकं घडलं काय ?


श्याम पाटील हा विद्यार्थी जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिकत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य यांनी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे तो नैराश्यात होता. संपूर्ण वर्गामोर आपल्याला सरांनी मारल्याने त्याला लाज वाटत होती आणि याच गोष्टीमुळे त्याने आत्महत्येसारखं टोकच पाऊल उचललं.



काय लिहिलंय त्या नोटमध्ये


श्यामने त्याच्या पप्पांना उद्देशून लिहिलंय की त्याची यात काही चूक नव्हती, मित्रांचे भांडण सोडवताना एकाने माझी कॉलर पकडली, त्याला मीही कानाखाली मारली, आणखी भांडण वाढायला नको म्हणून प्राचार्यांकडे गेलो असतो संपूर्ण स्टाफसमोर आणि मित्रांसमोर त्यांनी पीव्हीसी पाईपाने मारले. आणि दुसऱ्या मुलाला हातही लावला नाही. याआधीही अनेक वेळा असे झाले होते माझी काही चूक नसताना मी सरांचा आणि मित्रांचा खूप मार खाल्ला होता. माझी काहीच चूक नाही तुम्ही सीसीटीव्ही नक्की चेक करा. माझ्याकडून हे आणखी सहन होत नाही म्हणत २० वर्षाच्या श्याम पाटील ने गळफास घेत आत्महत्या केली.

Comments
Add Comment

विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी