Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात पुन्हा एकदा लक्षणीय बदल जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि हवामानाच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोकण किनारपट्टीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबदार आणि दमट हवामान असणार आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची जाणीव अधिक तीव्र होईल . कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या आसपास आहे, तर किमान तापमान २२ ते २४ अंशांदरम्यान आहे. किनारपट्टी भागात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल.


आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात हवामान कोरडे राहील. येथे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांदरम्यान आहे, तर किमान तापमान १६ ते १९ अंशांदरम्यान नोंदवले जात आहे. सकाळी हलका गारवा असला तरी दुपारी वातावरण उबदार असेल.


गेले काही दिवस मराठवाडा आणि विदर्भ विभागात स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान आहे. आजही या भागातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी आदी भागात कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांदरम्यान पोहोचले आहे. किमान तापमान १८ ते २२ अंशांदरम्यान आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे.


एकंदरीत १५ फेब्रुवारी रोजी राज्यात तापमान वाढीचा कल कायम आहे. आकाश स्वच्छ, पावसाचा अभाव आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. पुढील काही दिवसांतही राज्यात कोरडे आणि उबदार हवामान कायम राहील आणि हिवाळ्याचा प्रभाव आणखी कमी होत जाईल. यासोबत कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही हवामान विभागाने उष्णता वाढणार असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर