Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात पुन्हा एकदा लक्षणीय बदल जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि हवामानाच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोकण किनारपट्टीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबदार आणि दमट हवामान असणार आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची जाणीव अधिक तीव्र होईल . कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या आसपास आहे, तर किमान तापमान २२ ते २४ अंशांदरम्यान आहे. किनारपट्टी भागात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल.


आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात हवामान कोरडे राहील. येथे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांदरम्यान आहे, तर किमान तापमान १६ ते १९ अंशांदरम्यान नोंदवले जात आहे. सकाळी हलका गारवा असला तरी दुपारी वातावरण उबदार असेल.


गेले काही दिवस मराठवाडा आणि विदर्भ विभागात स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान आहे. आजही या भागातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी आदी भागात कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांदरम्यान पोहोचले आहे. किमान तापमान १८ ते २२ अंशांदरम्यान आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे.


एकंदरीत १५ फेब्रुवारी रोजी राज्यात तापमान वाढीचा कल कायम आहे. आकाश स्वच्छ, पावसाचा अभाव आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. पुढील काही दिवसांतही राज्यात कोरडे आणि उबदार हवामान कायम राहील आणि हिवाळ्याचा प्रभाव आणखी कमी होत जाईल. यासोबत कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही हवामान विभागाने उष्णता वाढणार असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात; फॉर्च्युनरचा अक्षरशः चुराडा, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; घाट परिसर, कोकण आणि मराठवाड्यात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या