रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला. ही धक्कादायक घटना राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या भांदक येथे रेल्वेच्या हद्दीत घडली. रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळ १८ वर्षांच्या दुर्गेश प्रसाद मसरामने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला.


दुर्गेश मूळचा मध्य प्रदेशमधील कोको येथील रहिवासी होता. तो कुटुंबासह मोलमजुरीसाठी भांदक येथे आला होता. पण ऐन तारुण्यात दुर्गेशने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजलेले नाही. दुर्गेशच्या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती रेल्वे स्थानक परिसरात वर्धा-बल्लारशाह रेल्वे मार्ग आणि सायडिंगचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी आलेल्या मजुरांची वस्ती याच परिसरात आहे. दुर्गेश त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह याच भागात वास्तव्यास होता.


पहाटेच्या सुमारास दुर्गेश घरात नसल्याचे कुटुंबातील इतर सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. ही शोधाशोध सुरू असताना रेल्वे पोलिसांना रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळील एका वीज खांबाला लटकून तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले. घटनास्थळी पोलीस आणि दुर्गेशच्या कुटुंबातील सदस्य पोहोचले तेव्हा दुर्गेशने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......

बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर