Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात सोमवारी पहाटे गिट्टीखदान पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात पीडित मुलाच्या परिचित असलेल्या मित्रांनीच हा गुन्ह्या केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयराम गोपाल यादव (१९, रा. गिट्टीखदान), केतन उर्फ कुणाल रमेश शाहू (२२, रा. गिट्टीखदान) आणि आयुष मोहन शाहू (१९, रा. मानकापूर) यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी भाजीपाल्याचा व्यवसाय करत असून, अथर्वच्या कुटुंबाशी त्यांची ओळख होती.


नेमकं काय घडलं ?


माहितीनुसार अथर्वच्या वडिलांचा भाजीपाल व्यवसाय असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती आरोपींना होती. त्यानुसार त्यांनी ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचला. या अपहरणाची योजना ३ दिवसांपूर्वी आखण्यात आली होती.


हनुमान जयंतीच्या दिवशी गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्यावेळी जयराम यादवनं त्याला बोलावून एका टाटा एस वाहनाजवळ नेलं, जिथे इतर दोन्ही आरोपी आधीच उपस्थित होते. तिघांनी मिळून अथर्वला जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि आवाज करू नये म्हणून त्याचं तोंड बांधलं.


यानंतर आरोपींनी अथर्वला गोरेवाडा परिसरात नेलं. सुरुवातीला त्याला बेशुद्ध करून खंडणीसाठी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तो बेशुद्ध होत नसल्यानं आरोपींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्येच अथर्वचा मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या आरोपींनी कापडानं गळा दाबून हत्या केल्याचंही समोर आलं आहे. या आरोपींनी हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी अथर्वचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे क्रॉसिंग फ्लायओव्हरजवळ भरतवाडा परिसरात फेकून दिला आणि वापरलेली गाडी धुवून टाकली.


दरम्यान, अथर्व बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये एक संशयास्पद टाटा एस वाहन दिसून आल्याने या आधारे पोलिसांनी आयुष शाहूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर इतर दोन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली असून, सध्या या प्रकरणाबाबत आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा