Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात सोमवारी पहाटे गिट्टीखदान पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात पीडित मुलाच्या परिचित असलेल्या मित्रांनीच हा गुन्ह्या केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयराम गोपाल यादव (१९, रा. गिट्टीखदान), केतन उर्फ कुणाल रमेश शाहू (२२, रा. गिट्टीखदान) आणि आयुष मोहन शाहू (१९, रा. मानकापूर) यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी भाजीपाल्याचा व्यवसाय करत असून, अथर्वच्या कुटुंबाशी त्यांची ओळख होती.


नेमकं काय घडलं ?


माहितीनुसार अथर्वच्या वडिलांचा भाजीपाल व्यवसाय असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती आरोपींना होती. त्यानुसार त्यांनी ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचला. या अपहरणाची योजना ३ दिवसांपूर्वी आखण्यात आली होती.


हनुमान जयंतीच्या दिवशी गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्यावेळी जयराम यादवनं त्याला बोलावून एका टाटा एस वाहनाजवळ नेलं, जिथे इतर दोन्ही आरोपी आधीच उपस्थित होते. तिघांनी मिळून अथर्वला जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि आवाज करू नये म्हणून त्याचं तोंड बांधलं.


यानंतर आरोपींनी अथर्वला गोरेवाडा परिसरात नेलं. सुरुवातीला त्याला बेशुद्ध करून खंडणीसाठी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तो बेशुद्ध होत नसल्यानं आरोपींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्येच अथर्वचा मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या आरोपींनी कापडानं गळा दाबून हत्या केल्याचंही समोर आलं आहे. या आरोपींनी हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी अथर्वचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे क्रॉसिंग फ्लायओव्हरजवळ भरतवाडा परिसरात फेकून दिला आणि वापरलेली गाडी धुवून टाकली.


दरम्यान, अथर्व बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये एक संशयास्पद टाटा एस वाहन दिसून आल्याने या आधारे पोलिसांनी आयुष शाहूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर इतर दोन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली असून, सध्या या प्रकरणाबाबत आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Dhule Crime News : “अपमान सहन झाला नाही”; संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे : धुळ्यातील एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक

Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई - पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास