Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात सोमवारी पहाटे गिट्टीखदान पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात पीडित मुलाच्या परिचित असलेल्या मित्रांनीच हा गुन्ह्या केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयराम गोपाल यादव (१९, रा. गिट्टीखदान), केतन उर्फ कुणाल रमेश शाहू (२२, रा. गिट्टीखदान) आणि आयुष मोहन शाहू (१९, रा. मानकापूर) यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी भाजीपाल्याचा व्यवसाय करत असून, अथर्वच्या कुटुंबाशी त्यांची ओळख होती.


नेमकं काय घडलं ?


माहितीनुसार अथर्वच्या वडिलांचा भाजीपाल व्यवसाय असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती आरोपींना होती. त्यानुसार त्यांनी ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचला. या अपहरणाची योजना ३ दिवसांपूर्वी आखण्यात आली होती.


हनुमान जयंतीच्या दिवशी गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्यावेळी जयराम यादवनं त्याला बोलावून एका टाटा एस वाहनाजवळ नेलं, जिथे इतर दोन्ही आरोपी आधीच उपस्थित होते. तिघांनी मिळून अथर्वला जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि आवाज करू नये म्हणून त्याचं तोंड बांधलं.


यानंतर आरोपींनी अथर्वला गोरेवाडा परिसरात नेलं. सुरुवातीला त्याला बेशुद्ध करून खंडणीसाठी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तो बेशुद्ध होत नसल्यानं आरोपींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्येच अथर्वचा मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या आरोपींनी कापडानं गळा दाबून हत्या केल्याचंही समोर आलं आहे. या आरोपींनी हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी अथर्वचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे क्रॉसिंग फ्लायओव्हरजवळ भरतवाडा परिसरात फेकून दिला आणि वापरलेली गाडी धुवून टाकली.


दरम्यान, अथर्व बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये एक संशयास्पद टाटा एस वाहन दिसून आल्याने या आधारे पोलिसांनी आयुष शाहूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर इतर दोन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली असून, सध्या या प्रकरणाबाबत आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व