जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. उड्डाणपुलाखाली अतिक्रमणांसह साचलेली कचरा आणि त्यापासून पसरलेली दुर्गंधीची जळमटेच आता महापालिकेने हटवून या पुलाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीतील पूलाच्या खालील भाग साफ करण्यात आल्याने कधी नव्हेतर जे जे उड्डाणपूलाच्या खाली भाग जळमटे दूर केल्याने सुंदर दिसू लागला आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांसह पदपथांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आल्यानंतर महापालिकेच्या बी विभागाच्यावतीनेही डोंगरी,मोहमद अली रोड, मस्जिद बंदर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई हाती घेण्यात आली आहे. बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी महापालिका परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यापासून या मुस्लिम बहुल परिसरात जिथे महापालिकेच्यावतीने कारवाई करण्याची हिंमत दाखवली जात नाही तिथे आता कारवाई केली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शरीफ देवजी स्ट्रीट अर्थात चकला स्ट्रीट येथील वाढीव बांधकामे तसेच पदपथ अडवून केलेले बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. एवढे मस्जिद बंदर येथीलही बांधकामे आणि अतिक्रमण हटवतानाच मकदुम अली महिमी उड्डाणपूल अर्थात जे जे उड्डाणपूलाखाली सर्व अतिक्रमणांपासून तो तिथे वर्षांनुवर्षे जमा झालेला कचरा हटवून पुलाखालील परिसर स्वच्छ सुंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीत पुलाखालील परिसरात जो बकालपणा दिसत होता, तो बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी आपल्या चमुसह दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता वाहनातून प्रवास करतानाही पुलाखालील परिसराचे स्वच्छ आणि सुंदर दर्शन होताना दिसणार आहे. तसेच पुलाखालील भागांमधील पदपथांवर अनावश्यक कठडे बांधून ठेवले आहेत तेही तोडून टाकण्यावर भर दिला आहे.

Comments
Add Comment

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना

विजय मल्ल्या भारतात परतणारच नसतील, तर आम्ही याचिका का ऐकावी?

मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल मुंबई  : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने आधी भारतात परत यावे. आम्ही तातडीने