Narhari Zirwal: "चौकशीत नाव आलं तर..."; ACB च्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "या प्रकारच्या चौकशीत माझं नाव आलं तर मी राजीनामा देईन", अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



नेमकं काय म्हणाले नरहरी झिरवाळ ?


नरहरी झिरवाळ यावेळी दिल्लीत असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जर या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध आढळला तर राजीनामा देणार असं जाहीर केलं आहे. तसंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचे दावे फेटाळून लावले. आपण मुंबईत गेल्यावर बैठक घेणार असून, इतर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


"मी तर परवापासून येथे आहे. हा प्रकार चुकी़चा असून, असं व्हायला नको होतं. ढेरंगे हे आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात. सुनावणीते पेपर बनवण्याचं काम ते करतात. तसे ते मूळचे अन्न, नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसणवारीवर घेतललं होतं. आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. त्याला जाब द्यावा लागणार आहे," असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं आहे.



नेमकं प्रकरण काय ?


अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी िझरवाळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवाळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतले. तपास झाल्यानंतर मग या संबंधित लिपिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.

Comments
Add Comment

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

William Langford : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा रहस्यमयी मृत्यू, खोलीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट

IPL 2026 : हंगामातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

मुंबई : आयपीएल २०२६ च्या चौथ्या सामन्यात मंगळवारी (३१ मार्च) पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

Mumbai Local Mega block Update : मुंबईत अचानक 'इतक्या' लोकल फेऱ्या झाल्या रद्द, आता शेवटचीही गाडी सुटणार 'या' वेळेवर

मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या