रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही


रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षातील १५ दिवस ध्वनीवर्धक (स्पीकर) व ध्वनीक्षेपक वापरास सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड, किशन जावळे यांनी १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत १५ दिवसांकरिता ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सूट दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.


या आदेशानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा पाळून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.


सूट देण्यात आलेले दिवस : शिवजयंती १९ फेब्रुवारी (१ दिवस), होळी पौर्णिमा २ मार्च (१ दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (१ दिवस), ईद-ए-मिलाद २६ ऑगस्ट (१ दिवस), गणपती उत्सव १५ सप्टेंबर (दुसरा दिवस), १९ सप्टेंबर (गौरी विसर्जन), २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) ३ दिवस, गणपती (साखरचौथ विसर्जन) ३० सप्टेंबर (१ दिवस), नवरात्री उत्सव १७ ते २० ऑक्टोबर (४ दिवस), दिवाळी (लक्ष्मीपूजन) ८ नोव्हेंबर (१ दिवस), ख्रिसमस २५ डिसेंबर (१ दिवस),३१ डिसेंबर – (१ दिवस)


दरम्यान ही सूट राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. ध्वनीप्रदूषण नियम, २००० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १९ (अ) अन्वये आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली  : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या