सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर आढावा


मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या विकासाच्या गरजा, पर्यटनवाढ, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करता जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची मागणी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.



जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी गुरुवारी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री  आशिष जैसवाल, आमदार  दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती तसेच ग्रामीण व नागरी भागातील विकासकामांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विकासकामांची प्रभावी, दर्जेदार व वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा नियोजन निधीत वाढ करण्याची मागणी या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक निधीची गरज स्पष्ट केली.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना