सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर आढावा


मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या विकासाच्या गरजा, पर्यटनवाढ, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करता जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची मागणी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.



जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी गुरुवारी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री  आशिष जैसवाल, आमदार  दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती तसेच ग्रामीण व नागरी भागातील विकासकामांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विकासकामांची प्रभावी, दर्जेदार व वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा नियोजन निधीत वाढ करण्याची मागणी या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक निधीची गरज स्पष्ट केली.

Comments
Add Comment

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन