राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरले; माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा टोला

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत केलेल्या उद्बोधनावर राज ठाकरे यांनी टीका केली. त्यानंतर भाजपसह संघ वर्तुळातून राज यांच्या विधानाचा कठोर शब्दांत समाचार घेतला जात आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील राज यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत, "सरसंघचालकांच्या उद्बोधनाला आलेले मान्यवर नव्हे, तर राज ठाकरेच नरेंद्र मोदींना जास्त घाबरत आहेत, " असा टोला लगावला.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, कार्यपद्धती आणि समाजातील योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्यामुळे या कार्यक्रमाची देशभरात चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून टीका केली. कार्यक्रमाला आलेली मंडळी संघप्रेमापोटी नव्हती, तर सरकारच्या दबावामुळे किंवा भीतीमुळे आली होती, असा आरोप त्यांनी केला. यापूर्वी अशा कार्यक्रमांना कोणी का उपस्थित राहिले नव्हते, असा सवाल उपस्थित करत ही उपस्थिती संघासाठी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भीतीपोटी असल्याचे त्यांनी म्हटले.


राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर भगतसिंह कोश्यारी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. संघाच्या कार्यक्रमाला लोक मोदींना घाबरून आले नव्हते. उलट राज ठाकरेच नरेंद्र मोदींना जास्त घाबरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांनी मोदींना घाबरू नये, तर त्यांच्या जवळ जावे, असा सल्लाही त्यांनी दिला. मोदींसाठी सर्व जनता समान आहे, असे सांगताना कोश्यारी यांनी प्रभू राम आणि त्यांच्या प्रजेचा दाखला दिला. ज्या पद्धतीने रामाला सर्व प्रजा समान होती, त्याचप्रमाणे मोदींसाठीही सर्व नागरिक समान आहेत, असे ते म्हणाले. राज ठाकरे माझे ‘लहान भाऊ’ आहेत. ते वाणीने कडक असले तरी चांगले नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत राहणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत, चुकीचे काम करण्यास घाबरावे; मात्र व्यक्तींना घाबरू नये, असा सल्लाही भगतसिंह कोश्यारी यांनी दिला.

Comments
Add Comment

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन वर्षांत 'युएई' आणि सिंगापूरपेक्षा मोठी होणार'

देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्रच मुंबई : महाराष्ट्राचा जीडीपी २०१३ - १४ मध्ये १६ लाख कोटी

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

जमीन भूसंपादन प्रकरणात एसआयटी चौकशीचे महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय