समृद्धी महामार्गावर आठ महिलांचा अपघाती मृत्यू

मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले तसेच नियमानुसार मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.



एका कंत्राटी कामावर मजुरी करत असलेल्या महिला पिकअपमध्ये बसल्या होत्या आणि पुढील प्रवासाला निघणार होत्या. या उभ्या असलेल्या पिकअपला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही घटना समृद्धी महामार्गावर जालना परिसरात जामवाडी शिवारात घडली. पिकअपला धडक देणारा ट्रक नागपूरवरून मुंबईच्या दिशेने वेगाने प्रवास करत होता. ट्रकने पिकअपला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की पिकअपमधील काही महिला धक्क्याने बाहेर फेकल्या गेल्या आणि ट्रकखाली चिरडल्या गेल्या. मृतदेह रस्त्यावर इतस्ततः पडले होते. जेवणाचे डबे, चपला इत्यादी साहित्य विखुरले होते. ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा झाला. अपघातात मृत्यू झालेल्या सर्व महिला या बदनापूरमधील केळीगव्हाण गावच्या आहेत.
Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल