समृद्धी महामार्गावर आठ महिलांचा अपघाती मृत्यू

मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले तसेच नियमानुसार मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.



एका कंत्राटी कामावर मजुरी करत असलेल्या महिला पिकअपमध्ये बसल्या होत्या आणि पुढील प्रवासाला निघणार होत्या. या उभ्या असलेल्या पिकअपला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही घटना समृद्धी महामार्गावर जालना परिसरात जामवाडी शिवारात घडली. पिकअपला धडक देणारा ट्रक नागपूरवरून मुंबईच्या दिशेने वेगाने प्रवास करत होता. ट्रकने पिकअपला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की पिकअपमधील काही महिला धक्क्याने बाहेर फेकल्या गेल्या आणि ट्रकखाली चिरडल्या गेल्या. मृतदेह रस्त्यावर इतस्ततः पडले होते. जेवणाचे डबे, चपला इत्यादी साहित्य विखुरले होते. ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा झाला. अपघातात मृत्यू झालेल्या सर्व महिला या बदनापूरमधील केळीगव्हाण गावच्या आहेत.
Comments
Add Comment

Pune Landslide : पुण्यातील मावळ तालुक्यात घरावर दरड कोसळली; कुटुंब अडकल्याची भीती, NDRFचे बचावकार्य सुरू

पुणे : मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. एका

Mumbai rain news : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला, सरकारी कार्यालये अर्धा दिवस सुरू राहणार

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन

Pune Mumbai Expressway : मुसळधार पावसाचा मोठा फटका; पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि जुना महामार्ग दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद

मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Devendra Fadnavis : देशी गायीकडे ज्या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांचे नुकसान झाले, मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

नागपूर (Nagpur) : भारत देश हा कृषी संस्कृतीचा होता. देश संपन्न होता. दूध,दही भरपूर प्रमाणात होते. हे समृद्धीचे प्रतीक

Mayor Ritu Tawde : कुर्ल्यातील वृक्ष दुर्घटनेनंतर महापौर ॲक्शन मोडमध्ये! मृताच्या कुटुंबाला ₹५ लाखांची मदत; मुंबईत तातडीच्या ट्री ऑडिटचे आदेश

मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा परिसरात झाडाची फांदी कोसळून ६३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी