10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी पासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. अशातच ठाणे वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून एक अनोखी शक्कल लढवली आहे.


परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना होणाऱ्या प्रवासाच्या अडचणी कमी करण्यासाठी, ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात मोटारसायकलवर ५४ वाहतूक हवालदार तैनात केले आहेत.


वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थी किंवा त्यांचे पालक वाहतूक नियंत्रण हेल्पलाइन, व्हॉट्सअॅप किंवा १८ ट्रॅफिक युनिटपैकी कोणत्याही एका युनिटद्वारे त्यांचे लाईव्ह लोकेशन शेअर करून मदत मागू शकतात. वाहतूक कोंडी किंवा वाहनांच्या बिघाडामुळे त्यांना उशीर होऊ नये म्हणून दुचाकीवरून एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांना परीक्षा केंद्रावर सोडेल.


गेल्या वर्षीही असाच एक उपक्रम ठाणे वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात आला होता. त्यावेळी ३२ पोलिसांनी दुचाकीवरून वाहतूक कोंडीत अडकलेल्या ३४ विद्यार्थ्यांची मदत केली होती.


सध्या सर्वत्र अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो बांधकाम आणि महामार्ग प्रकल्प सुरू असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. अशातच परीक्षेच्या काळात सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत जड वाहनांना त्या मार्गांवरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जड वाहन चालकांनी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.


ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २२३ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १२६ परीक्षा केंद्रे आहेत.

Comments
Add Comment

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न साकार; इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात!

रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी 'एमआयडीसी' रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरीत करण्याचा

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५०

CM Devendra Fadnavis Delhi Visit: मुख्यमंत्री फडणवीसांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर विशेष लक्ष, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर निर्णय होणार?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या

Government Job: राज्यात ७० हजार पदांची भरती होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री

Dada Bhuse : 'परीक्षा ही सुंदर प्रवासाची सुरुवात; आत्मविश्वासाने सामोरे जा', मा.शिक्षण मंत्री श्री .दादाजी भुसे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि