ZP Election Result 2026 : महाराष्ट्र मिनी विधानसभा: जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची जोरदार मुसंडी, भाजप ठरतोय सर्वात मोठा पक्ष

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. सुरुवातीच्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने ७० जागांवर आघाडी घेत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (३८ जागा) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (४३ जागा) मोलाची साथ दिली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीसाठी सुरुवातीचे कल चिंतेचे ठरणार असे दिसत आहे. यामध्ये काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अनुक्रमे ६ आणि ३ जागांवर मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर आणि छत्र



सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी


भाजप- ७०
शिवसेना शिंदे गट- ३८
राष्ट्रवादी अजित पवार गट- ४३
काँग्रेस- २१
शिवसेना ठाकरे गट- १४
राष्ट्रवादी शरद पवार गट- ३
इतर- ११



कोकणात महायुतीचा ‘डंका’


महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकण पट्ट्यात महायुतीने विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. प्रत्यक्ष मतमोजणी पूर्ण होण्याआधीच महायुतीच्या तब्बल २७ उमेदवारांनी बिनविरोध विजय संपादन करत विजयाचे खाते उघडले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील ५० सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ असे एकूण ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पंचायत समितीमध्ये तर महायुतीने मोठी मजल मारली असून, १०० पैकी १७ जागा आधीच खिशात घातल्या आहेत. यात भाजपचे १६ सदस्य बिनविरोध निवडून आले असून शिंदे गटाला १ जागा मिळाली आहे. सिंधुदुर्गाप्रमाणेच रायगड आणि रत्नागिरीतही शिवसेनेने (शिंदे गट) बाजी मारली आहे. रायगडच्या महाडमधील सवाने धामणे गणातून अनिल जाधव यांच्याविरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला. रत्नागिरीमध्ये नाणीज पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधकांनी माघार घेतल्याने आणि महायुतीची भक्कम रणनीती यामुळे मतदानापूर्वीच कोकणात महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा