Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. वीर जलाशयातून मुळा जलाशय येथे स्थलांतरित झालेल्या पिंजरा मत्स्य संवर्धन करणाऱ्या लाभार्थ्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष 'क्लस्टर' निर्माण करण्याची संकल्पना मंत्री राणे यांनी सोमवारी मांडली. या माध्यमातून तिलापिया माशांच्या कातडीपासून (स्किन) पर्स तयार करण्यासारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना शासन स्तरावर बळ देण्याबाबत चर्चा झाली.





मत्स्य शेती करणाऱ्या मागासवर्गीय लाभार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत नितेश राणे बोलत होते. यावेळी मत्स्य उत्पादनांचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचा नफा कसा वाढवता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या शेतकरी गटाने तिलापिया माशांच्या कातडीपासून तयार केलेल्या पर्स आणि इतर शोभिवंत वस्तूंचे सादरीकरण केले. तसेच तिलापिया माशांपासून बनवलेले फिश फिंगर, फिश बर्गर आणि फिश मोमोज यांसारख्या प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांची माहितीही मंत्र्यांनी घेतली.


मत्स्य उत्पादक थेट उद्योजक बनतील – नितेश राणे


मत्स्य शेतकऱ्यांच्या या प्रयोगाचे कौतुक करताना नितेश राणे म्हणाले की, "मत्स्य उत्पादनांपासून उपपदार्थ तयार करून त्यांचे मूल्यवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या मत्स्य शेतकऱ्यांचा एक स्वतंत्र क्लस्टर तयार करून त्याअंतर्गत मत्स्य मूल्यवर्धन कारखाना व इतर पूरक प्रकल्प राबवण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील मत्स्य उत्पादक आता थेट उद्योजक बनू शकतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, क्लस्टरचे प्रतिनिधी नकुल अविनाश सदाफुले आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त