रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६ मध्ये सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर होऊन गेल्या. त्यानंतर १९९४- ९५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर या दुसऱ्या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर मात्र सन १९९७ -९८ पासून ते २०२२ या कालावधीत तत्कालीन शिवसेनेच्या अखंड सलग पाच महिला महापौर झाल्या आहेत.


मात्र यावेळी २०२६ मध्ये महापौर पदासाठी खुला वर्ग महिला आरक्षण असल्याने भाजपच्यावतीने रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवार म्हणून घोषित करून त्यांनी शनिवारी आपला अर्ज सादर केला आहे. प्रतिस्पर्धी पक्षाकडून अर्ज दाखल न झाल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. आता केवळ निवडणुकीची औपचारिकता शिल्लक असून बुधवारी त्यांना महापौर म्हणून पिठासीन अधिकारी घोषित करणार आहेत.


मुंबई महापालिकेच्या इतिहासात महापौर पद हे मोठे प्रतिष्ठेचे पद आहे. मुंबईच्या महापौरांना विशेष मोठे अधिकार नाहीत. मात्र महापौर पद हे महत्वाचे आहे. मुंबईत देशाच्या राष्ट्रपतींचे आगमन झाल्यास राजशिष्टाचारानुसार मुंबईच्या महापौरांना त्यांचे स्वागत करण्याचा पहिला मान दिला जातो. महापालिकेत महापौरांना काही मर्यादित अधिकार असल्याने त्या आर्थिक बाबींशी संबंधित प्रस्तावांना मान्यता देऊ शकतात. त्यांना महापौर निधीतून वैद्यकीय उपचारासाठी गरजू लोकांना आर्थिक मदत करू शकतात. महापौर शिक्षक पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांच्या नावांची शिफारस करू शकतात. आणखीन काही मर्यादित स्वरूपाचे अधिकार महापौरांना आहेत. त्यामुळे महापौर पद हे प्रतिष्ठेचे आहे. मुंबई महापालिकेत १९९७ पासून सलग २६ वर्षे तत्कालीन शिवसेनेचे महापौर होते. विशेष म्हणजे १९५५ पासून ते आजपर्यंत मुंबईत ज्या सात महिला महापौर झाल्या आहेत, त्यामध्ये तत्कालीन शिवसेनेच्या पाच महिला महापौरांचा समावेश आहे.



मुंबई महापालिकेतील महिला महापौर


१९५५ -१९ ५६ : सुलोचना मोदी


१९९४ - १९९५ :ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर


१९९७ -१९ ९८ : विशाखा राऊत


२००७ -२० ०९ : डॉ. शुभा राऊळ


२००९ - २०१२ : श्रद्धा जाधव


२०१४ - २०१७ : स्नेहल आंबेकर


२०१९ -२० २२ : किशोरी पेडणेकर

Comments
Add Comment

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना