Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार,प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.


मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?


परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा.
हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.


ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Healthy Juice : तुम्ही कधी ABC ज्यूस प्यायला आहे का? कसा बनवायचा आणि शरीराला काय फायदे होतात?

ABC ज्यूस म्हणजे काय? चला जाणून घेऊया : सध्या सोशल मीडियावर ABC ज्यूस चे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. हे एक आरोग्यदायी

Nashik : महापालिकेच्या रुग्णालयांचा स्थायी समितीकडून पंचनामा, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी स्वतंत्र बैठक

Nashik : नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) बिटको, डॉ. झाकीर हुसेनसह अन्य रुग्णालयांतील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारावर

Millets Benefits : नाचणी,ज्वारी, बाजारी यांच्यात फरक काय? आरोग्यासाठी कोणते धान्य फायदेशीर?

नाचणी, ज्वारी आणि बाजरी यांच्यात काय फरक आहे? वजन कमी करण्यासाठी, मधुमेह नियंत्रणासाठी आणि निरोगी आहारासाठी

Overripe Fruits Recipes : फळं जास्त पिकली? फेकू नका! बनवा भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ; मुलंही मागून-मागून खातील

Nashik Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मनपात मानधनावर भरतीची तयारी

Nashik Simhastha Kumbhmela : आगामी सिंहस्थ कुंभमळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आणि प्रत्यक्ष