मुंबईमध्ये 'श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग'चे आयोजन

मुंबई : श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोने मुंबईमध्ये श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंगचे आयोजन केले होते. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमामध्ये श्रीलंकेच्या प्रवास आणि पर्यटन उद्योगाच्या सदस्यांबरोबरीने भारतातील प्रमुख टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, बैठका, प्रोत्साहन कार्यक्रम, परिषदा आणि प्रदर्शने (माईस) प्लॅनर्स, कॉर्पोरेट्स, एयरलाईन्स आणि प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. हा उपक्रम दोन्ही देशांच्या व्यापारी समुदायांदरम्यान संवाद, सहयोग आणि व्यावसायिक विकासाचा एक मजबूत पूल बनला. पर्यटन, व्यापार आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी श्रीलंकेची वाढती लोकप्रियता यावेळी ठळकपणे प्रदर्शित केली गेली.


२०२५ मध्ये श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रात मोठी भरभराट पाहायला मिळाली. तिथे २३.६ लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. श्रीलंकेच्या इतिहासातील पर्यटकांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी, विक्रमी संख्या आहे. या यादीत भारत आघाडीवर असून ५.३१ लाखांहून अधिक भारतीयांनी श्रीलंकेला भेट दिली. हे प्रमाण एकूण पर्यटकांच्या सुमारे २७% असून इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत दुप्पट आहे. ही आकडेवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील जुने सांस्कृतिक संबंध आणि दोन्ही देशांमधील सुधारलेली विमान सेवा व मार्केटिंग प्रयत्नांचे फळ आहे.


कार्यक्रमाची सुरुवात भारत आणि श्रीलंकेच्या राष्ट्रगीतांनी आणि पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर 'श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो' आणि 'श्रीलंका एअरलाईन्स'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, श्रीलंकेत सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन संस्कृती आणि जंगलांसोबतच साहसी पर्यटन आणि योग-वेलनेसच्या देखील उत्तम सुविधा आहेत. श्रीलंकेच्या पर्यटनाला पुन्हा उभारी देण्यात भारताचा सर्वात मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाढती गर्दी लक्षात घेता, श्रीलंका एअरलाईन्स आणि भारतीय विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमधून विमान फेऱ्यांची संख्या वाढवली आहे, जेणेकरून पर्यटक आणि व्यापाऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल.


श्रीलंकेच्या पारंपरिक नृत्य आणि संगीताने या कार्यक्रमाची शोभा वाढवली, ज्यामध्ये तिथल्या समृद्ध कला आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. कार्यक्रमाचा समारोप शानदार जेवण आणि स्नेहमेळाव्याने झाला. यावेळी उपस्थितांना एकमेकांशी संवाद साधण्याची, सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची आणि श्रीलंकेच्या आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमात आयोजित केलेल्या 'राफल ड्रॉ'मुळे संध्याकाळ अधिकच मजेशीर आणि उत्साही झाली.


भारत ही श्रीलंकेसाठी सर्वात महत्त्वाची पर्यटन बाजारपेठ राहिली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्यूरोने भारतासोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. केवळ कौटुंबिक सहलींसाठीच नव्हे, तर कॉर्पोरेट बैठका, विवाह सोहळे आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुभवात्मक प्रवासासाठी एक उत्तम देश म्हणून श्रीलंकेची ओळख निर्माण करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे प्रयत्न श्रीलंकेच्या त्या व्यापक धोरणाचा भाग आहेत, ज्याद्वारे २०२६ पर्यंत ३० लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. श्रीलंका सध्या जागतिक स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करत असून भारतासोबतचे आपले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक वाढवत आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा