मुंबईमध्ये 'श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग'चे आयोजन

मुंबई : श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोने मुंबईमध्ये श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंगचे आयोजन केले होते. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमामध्ये श्रीलंकेच्या प्रवास आणि पर्यटन उद्योगाच्या सदस्यांबरोबरीने भारतातील प्रमुख टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, बैठका, प्रोत्साहन कार्यक्रम, परिषदा आणि प्रदर्शने (माईस) प्लॅनर्स, कॉर्पोरेट्स, एयरलाईन्स आणि प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. हा उपक्रम दोन्ही देशांच्या व्यापारी समुदायांदरम्यान संवाद, सहयोग आणि व्यावसायिक विकासाचा एक मजबूत पूल बनला. पर्यटन, व्यापार आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी श्रीलंकेची वाढती लोकप्रियता यावेळी ठळकपणे प्रदर्शित केली गेली.


२०२५ मध्ये श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रात मोठी भरभराट पाहायला मिळाली. तिथे २३.६ लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. श्रीलंकेच्या इतिहासातील पर्यटकांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी, विक्रमी संख्या आहे. या यादीत भारत आघाडीवर असून ५.३१ लाखांहून अधिक भारतीयांनी श्रीलंकेला भेट दिली. हे प्रमाण एकूण पर्यटकांच्या सुमारे २७% असून इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत दुप्पट आहे. ही आकडेवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील जुने सांस्कृतिक संबंध आणि दोन्ही देशांमधील सुधारलेली विमान सेवा व मार्केटिंग प्रयत्नांचे फळ आहे.


कार्यक्रमाची सुरुवात भारत आणि श्रीलंकेच्या राष्ट्रगीतांनी आणि पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर 'श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो' आणि 'श्रीलंका एअरलाईन्स'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, श्रीलंकेत सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन संस्कृती आणि जंगलांसोबतच साहसी पर्यटन आणि योग-वेलनेसच्या देखील उत्तम सुविधा आहेत. श्रीलंकेच्या पर्यटनाला पुन्हा उभारी देण्यात भारताचा सर्वात मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाढती गर्दी लक्षात घेता, श्रीलंका एअरलाईन्स आणि भारतीय विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमधून विमान फेऱ्यांची संख्या वाढवली आहे, जेणेकरून पर्यटक आणि व्यापाऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल.


श्रीलंकेच्या पारंपरिक नृत्य आणि संगीताने या कार्यक्रमाची शोभा वाढवली, ज्यामध्ये तिथल्या समृद्ध कला आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. कार्यक्रमाचा समारोप शानदार जेवण आणि स्नेहमेळाव्याने झाला. यावेळी उपस्थितांना एकमेकांशी संवाद साधण्याची, सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची आणि श्रीलंकेच्या आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमात आयोजित केलेल्या 'राफल ड्रॉ'मुळे संध्याकाळ अधिकच मजेशीर आणि उत्साही झाली.


भारत ही श्रीलंकेसाठी सर्वात महत्त्वाची पर्यटन बाजारपेठ राहिली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्यूरोने भारतासोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. केवळ कौटुंबिक सहलींसाठीच नव्हे, तर कॉर्पोरेट बैठका, विवाह सोहळे आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुभवात्मक प्रवासासाठी एक उत्तम देश म्हणून श्रीलंकेची ओळख निर्माण करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे प्रयत्न श्रीलंकेच्या त्या व्यापक धोरणाचा भाग आहेत, ज्याद्वारे २०२६ पर्यंत ३० लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. श्रीलंका सध्या जागतिक स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करत असून भारतासोबतचे आपले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक वाढवत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी