ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींची धक्कादायक कृती

गाझियाबाद : ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींनी एक धक्कादायक कृती केली. या तीन अल्पवयीन बहि‍णींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. या धक्कादायक घटनेत तिघींचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरात ही घटना घडली आहे.



घरच्यांनी तिघींच्या सतत ऑनलाईन गेम खेळण्यावर आक्षेप घेतला. यामुळे निराश झालेल्या तीन अल्पवयीन बहि‍णींनी टोकाचा निर्णय घेतला. मृत मुलींचे वय अनुक्रमे बारा, चौदा आणि सोळा होते.


टोकाचा निर्णय घेणाऱ्या मुली टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरातल्या भारत सिटीमध्ये वास्तव्यास होत्या. मुलींनी एकदम टोक गाठल्याचे बघून पोलीस पण चक्रावले आहेत. या धक्कादायक घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. मुलींनी टोकाचा निर्णय घेण्यामागे फक्त ऑनलाईन गेम खेळण्यावर घेतलेला आक्षेप एवढेच कारण आहे की अन्य काही बाब आहे याचाही तपास पोलीस करत आहेत. सर्व शक्यतांचा विचार करून तपास केला जाईल आणि दोषींविरोधात कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.


मुलींनी बुधवार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. याआधी नेमके काय घडले याचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुली ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचा कोरियन लव्हर हा गेम खेळत होत्या.


प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार तिघी बहिणी बाल्कनीत आल्या. आधी एकीने उडी मारली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघींचाही मृत्यू झाला. तिघीजणी नवव्या मजल्यावरुन एकदम खाली जमिनीवर कोसळल्या. काय घडले आहे याची जाणीव होताच प्रत्यक्षदर्शीने मदत मागवली. पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन करून बोलावण्यात आले. मुलींनी उडी मारण्याआधी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीत वडिलांची माफी मागत एका डायरीचा उल्लेख करण्यात आला आहे. डायरीत सर्व सत्य कथन केल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतल्याचे समजते.


मुलींच्या वडिलांनी दोन वेळा लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून बराच काळ मूल झाले नाही म्हणून तिच्याच सख्ख्या बहिणीशी त्यांनी लग्न केले होते. यामुळे कौटुंबिक पातळीवर नेमके काय घडले याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

मध्यपूर्व देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी

दिल्ली: मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या

चेंबूरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मजूर पडल्याने महापौरांनी दिले कडक कारवाईचे आदेश

मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा मजूर पडले. या दुर्घटनेत एकाचा

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव

BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील

BMC : मुंबईत सव्वा लाख मुलींना देणार एचपीव्ही लस

- राष्ट्रीय मोहिमेचा शनिवारी झाला शुभारंभ - पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांमधील सुमारे २५ हजार मुलींचा