रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई


अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी रंगतदार लढाई होत असून, २०१७ साली झालेली निवडणूक लढवून विजयी झालेले १४ सदस्य यंदा पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागच्यावेळी पती निवडून आलेल्या तीन जागांवर पत्नी निवडणूक लढत असून, पत्नी निवडून आलेल्या सहा जागांवर यंदा पती निवडणूक लढवत आहेत.


रायगड जिल्हा परिषदेच्या २०१७ साली विजयी झालेल्या सात सदस्यांनी यंदा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे उर्वरित माजी सदस्यांना मतदार पुन्हा संधी देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मतदान व मतमोजणी तारीख बदलेली असून, मतदान व मतमोजणी दोन दिवस पुढे गेली आहे. ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दोन दिवस उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचे मिळाले आहेत. जिल्ह्यात सोयीनुसार युती, आघाडी करण्यात आलेली असून, रायगड जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याने जिल्हा परिषदेवर कोण आपले वर्चस्व प्रस्तापित करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


रायगड जिल्हा परिषद २०१७ च्या निवडणुकीत शेकापचे २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी ३ असे ५९ सदस्य निवडून गेले होते. मात्र नऊ वर्षांत राजकीय परिस्थिती बदललेली आहे. ‘शेकाप’चे आलेले २३ सदस्य हे सध्या इतर पक्षात गेल्याने शेकापला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागली आहे. या नवतरुण उमेदवारांना मतदार स्वीकारतात का हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मागच्यावेळी निवडून आलेले सुधाकर घारे, मोतीराम ठोंबरे, नरेश पाटील, रवींद्र देशमुख, सुरेश खैरे, आस्वाद पाटील, बबन मनवे हे यंदाच्या निवडणुकीपासून लांब राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मागच्यावेळी निवडून आलेले १४ जण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. त्यामुळे मतदार त्यांना पुन्हा संधी देणार का, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.


मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल


शेकाप - २३


शिवसेना – १८


राष्ट्रवादी काँग्रेस – १२


भाजप - ३


काँग्रेस - ३


माजी सदस्य पुन्हा आजमावणार नशीब
नारायण डामसे, नीलिमा पाटील, प्रभाकर म्हात्रे, रिना घरत, सुश्रूता पाटील, चित्रा पाटील, दिलीप भोईर, मानसी दळवी, सुरेंद्र म्हात्रे, राजश्री मिसाळ, किशोर जैन, गीता जाधव, स्वाती नवगणे, चंद्रकांत कळंबे हे पुन्हा नशीब आजमावत आहेत.

Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-शेकाप लढत

१४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात अलिबाग : अलिबाग पंचायत समिती निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत.