मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकळी खिंडीत शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघाताने मुंबई गोवा महामार्गवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ८ ते ९ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


अपघात इतका गंभीर होता की बस पूर्णपणे उलटून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. जखमींना तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, बस सुकळी खिंडीतून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच बस पलटी झाली. अपघातानंतर प्रवाशांचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली.


दरम्यान, बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, चालकाचा वेग किंवा निष्काळजीपणा कारणीभूत होता का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा