Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. या गर्दीचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर दिसून येत असून अनेक ठिकाणी कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.


माणगाव परिसरात प्रचंड ट्रॅफिक झाले आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, स्थानिक वर्दळ आणि महामार्गावरील वाहनांचा वाढलेला ताण यामुळे येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली की वाहनांच्या रांगा या अनेक किलोमीटरपर्यंत लागलेल्या दिसल्या.


कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवरही अशीच स्थिती असून प्रवाशांना तासन्‌तास प्रवास करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहे.


प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोपर्यंत माणगाव बायपास चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यटकांना भेडसावणारी ट्रॅफिकची हे समस्या कायम राहणार आहे.

Comments
Add Comment

Municipal Corporation : पीओपींच्या गणेश मूर्तींबाबत महापालिकेने भूमिका स्प्ष्ट करावी2

स्थायी समितीत सदस्यांनी मागणी विसर्जित गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्प खर्चाला मान्यता मुंबई : 

Ritu Tawade : प्रत्येक मुंबईकरांने एक झाड लावावे

मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली

MLA Amit Satam: हत्तीच्या पिंजऱ्याच्या जागेवर बिबट्या, रेड पांडा, हुलॉक गिबन आणि बिंटुरोंग

आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांना पत्र* मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष

Police Character certificate : फेरीवाल्यांना क्यु आर कोड देताना पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र तपासा

भाजपचे तिवाना यांची स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयादवारे मागणी मुंबई : मुंबई महानगरपालिकेमार्फत

Zakir Naik : 'त्या' महिलांना दाखवले झाकीर नाईकचे व्हिडीओ, TCS मधील धक्कादायक प्रकार

 मुंबई : नोकरीच्या ठिकाणी दबाव टाकून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी टीसीएसच्या नाशिक

Sunetra Pawar : बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा...

मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश मुंबई:-