Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. या गर्दीचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर दिसून येत असून अनेक ठिकाणी कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.


माणगाव परिसरात प्रचंड ट्रॅफिक झाले आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, स्थानिक वर्दळ आणि महामार्गावरील वाहनांचा वाढलेला ताण यामुळे येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली की वाहनांच्या रांगा या अनेक किलोमीटरपर्यंत लागलेल्या दिसल्या.


कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवरही अशीच स्थिती असून प्रवाशांना तासन्‌तास प्रवास करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहे.


प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोपर्यंत माणगाव बायपास चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यटकांना भेडसावणारी ट्रॅफिकची हे समस्या कायम राहणार आहे.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा