तळोजा-खांदेश्वर मेट्रोला मंजुरी

५ हजार ५७५ कोटींची तरतूद


तळोजा  : गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबईतील दुसऱ्या मेट्रो मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. तळोजा ते खांदेश्वरदरम्यान उभारण्यात येणाऱ्या या मेट्रो प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे ५ हजार ५७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे ८.१५ किमी लांबीची ही मार्गिका तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरांना जोडणार आहे. या मार्गिकेमुळे पनवेल परिसरातील प्रवास सुलभ होण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या मार्गावर खांदेश्वर, कामोठे सेक्टर १०, कळंबोली सेक्टर २ ई, सेक्टर ७ ई, सेक्टर १३, कडाडी तसेच तळोजा एमआयडीसी परिसरातील दोन स्थानके अशी एकूण आठ स्थानके प्रस्तावित आहेत. ही मार्गिका पुढे बेलापूर–पेंढार मेट्रोशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव सिडकोने २०११ मध्ये मांडला होता. त्या वेळी प्रकल्पाचा खर्च सुमारे १,६०५ कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र कालांतराने खर्च वाढून तो ५,५७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात दररोज हजारो कर्मचारी प्रवास करत असल्याने मेट्रो सुरू झाल्यानंतर लोकलची गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशीही भविष्यात जोडणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित