राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, पुण्याला रवाना

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याचे नियोजन असतानाच त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले आहेत.


शरद पवार सोमवारी रात्री मुंबईत होते. दिल्ली दौरा रद्द केल्यानंतर त्यांचा आजचा मुक्काम पुण्यात राहणार असून, त्यानंतर ते बारामतीला जाण्याची शक्यता आहे. बारामतीत पुढील दोन ते तीन दिवस त्यांचा मुक्काम असण्याची माहिती आहे. दिल्ली दौरा अचानक का रद्द करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू असताना हा दौरा रद्द झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


दरम्यान, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतण्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आणखी दोन वर्षे शिल्लक होता, त्यांची मुदत ४ जुलै २०२८ रोजी संपणार होती. मात्र, ही जागा राखून ठेवण्याऐवजी सहा वर्षांची पूर्ण मुदत असलेल्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही जागा लवकरच भरली जाण्याची शक्यता असून, त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. यापूर्वी बारामतीतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार राज्याrashtrawadi त उपमुख्यमंत्री म्हणून सूत्रे सांभाळतील, तर पार्थ पवार दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात पक्षाच्या बैठकीत पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. पार्थ यांनी यापूर्वी २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग