राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, पुण्याला रवाना

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याचे नियोजन असतानाच त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले आहेत.


शरद पवार सोमवारी रात्री मुंबईत होते. दिल्ली दौरा रद्द केल्यानंतर त्यांचा आजचा मुक्काम पुण्यात राहणार असून, त्यानंतर ते बारामतीला जाण्याची शक्यता आहे. बारामतीत पुढील दोन ते तीन दिवस त्यांचा मुक्काम असण्याची माहिती आहे. दिल्ली दौरा अचानक का रद्द करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू असताना हा दौरा रद्द झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


दरम्यान, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतण्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आणखी दोन वर्षे शिल्लक होता, त्यांची मुदत ४ जुलै २०२८ रोजी संपणार होती. मात्र, ही जागा राखून ठेवण्याऐवजी सहा वर्षांची पूर्ण मुदत असलेल्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही जागा लवकरच भरली जाण्याची शक्यता असून, त्यासाठी पार्थ पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. यापूर्वी बारामतीतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार राज्याrashtrawadi त उपमुख्यमंत्री म्हणून सूत्रे सांभाळतील, तर पार्थ पवार दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात पक्षाच्या बैठकीत पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. पार्थ यांनी यापूर्वी २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' शब्दावर आक्षेप, अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत

Krishna Temple : श्रीकृष्ण चरणी भक्ताने अर्पण केली २० लाखांची सोन्याची बासरी

राजस्थान : राजस्थानात चित्तोडगड जिल्ह्यातील मेवाडचे प्रसिद्ध श्री सावळिया सेठ मंदिरात जयपूर येथील एका भाविक

Cockroach Janata Party : जंतर-मंतरवर ‘हिंदू देवतांचा अवमान आणि ‘हेट स्पीच'; कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई(Mumbai): जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षेच्या प्रश्नावर

Navneet Rana : हनुमान गढीवर हजारो भाविकांसह नवनीत राणा व आ. रवि राणा यांचे हनुमान चालीसा पठण

अमरावती : अमरावतीतील श्री हनुमान गढी येथे शनिवारी हजारो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत भाजपा नेत्या तथा माजी

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ