उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकत्व

मुंबई : बारामती येथे विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली. त्यानंतर आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश मंगळवारी काढण्यात आला.


अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक आणि औकाफ, तसेच क्रीडा युवक कल्याण ही खाती देण्यात आली. दरम्यान, अजित पवार हे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर या जिल्ह्यांचे पालकत्व कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे अजित पवार यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर आहे.


बीड जिल्ह्यात घडलेल्या वादग्रस्त घटनांनंतर अजित पवार यांनी स्वतःकडे या जिल्ह्याचे पालकत्व घेतले होते. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील दौरे वाढवले होते. बीडसह पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले होते. तसेच बीड जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजित पवार यांनी ठोस पावले उचलली होती.

Comments
Add Comment

Ajit Pawar: अजित पवार शेवटी फोनवर काय बोलले, बारामतीतून मोठी माहिती समोर येणार

बारामती : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार